शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अनिल बाबर यांच्यावरील जयंतप्रेमाची रंगली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:27 IST

आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले.

ठळक मुद्देअनिल बाबर यांच्यावरील जयंतप्रेमाची रंगली चर्चासोशल मीडियावर व्हायरल

अविनाश बाडआटपाडी : आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. या भाषणाच्या चित्रफितीचे सध्या मतदारसंघात बाबर गटाचे कार्यकर्ते चांगलेच मार्केटिंग करीत आहेत; तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चित्रफितीनंतर, एवढ्या चांगल्या नेत्याला तुम्ही सत्तेत असताना का मंत्री केले नाही, अशीही विचारणा केली जात आहे. आ. पाटील यांचे प्रेम पुतना मावशीचे असल्याचे बोलले जात आहे.विधानसभेच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना आमदार पाटील यांनी आमदार बाबर यांची चांगलीच स्तुती केली. ते म्हणाले, बाबर यांच्यासारखा उत्तम प्रशासक, चिकाटीचा कार्यकर्ता तुमच्या पक्षाला मिळाला आहे. तुमचे सगळे आमदार एका बाजूला उभे करा आणि आमच्या बाबर यांना एका बाजूला उभे करा. चिकाटीचा आणि वसंतदादांच्या तालमीत शिकलेला नेता तुम्ही मंत्रिमंडळात घ्यायला हवा होता.आ. पाटील यांच्या या भूमिकेचे राजकीय जाणकार वेगवेगळे अर्थ काढत आहेत. केवळ ३५ सेकंदाच्या या चित्रफितीने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकारणातील अनेक नेत्यांचे व्यक्तिगत संबंध असतात; पण थेट विधानसभेत आ. पाटील यांनी सत्तारूढ पक्षातील आमदार बाबर यांची बाजू घेतली. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून येथील कोणत्याच लोकप्रतिनिधीला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. मात्र येथील नेत्यांनी स्वकर्तृत्वावर या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.आ. पाटील यांच्या या भाषणामुळे बाबरप्रेमी खुशीत दिसत आहेत. मात्र त्याचवेळी जेव्हा राष्ट्रवादी -कॉँग्रेसची सत्ता होती, तेव्हा बाबर यांना मंत्रिपदाची संधी देण्यापासून कुणी रोखले होते, की त्यांचे कर्तृत्व आणि महत्त्व ते शिवसेनेत गेल्यावर कळाले? आमदार बाबर टेंभू योजनेच्या पाण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. पण आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात केवळ भाषणबाजीशिवाय व अनुशेषाचे कारण दाखवण्याशिवाय ठोस काय झाले, की केवळ शिवसेनेत असंतोष पसरावा, यासाठी बाबर कर्तृत्ववान असल्याचा साक्षात्कार आमदार पाटील यांना झाला, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAnil Baburअनिल बाबरSangliसांगली