शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

अनिल बाबर यांच्यावरील जयंतप्रेमाची रंगली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:27 IST

आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले.

ठळक मुद्देअनिल बाबर यांच्यावरील जयंतप्रेमाची रंगली चर्चासोशल मीडियावर व्हायरल

अविनाश बाडआटपाडी : आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. या भाषणाच्या चित्रफितीचे सध्या मतदारसंघात बाबर गटाचे कार्यकर्ते चांगलेच मार्केटिंग करीत आहेत; तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चित्रफितीनंतर, एवढ्या चांगल्या नेत्याला तुम्ही सत्तेत असताना का मंत्री केले नाही, अशीही विचारणा केली जात आहे. आ. पाटील यांचे प्रेम पुतना मावशीचे असल्याचे बोलले जात आहे.विधानसभेच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना आमदार पाटील यांनी आमदार बाबर यांची चांगलीच स्तुती केली. ते म्हणाले, बाबर यांच्यासारखा उत्तम प्रशासक, चिकाटीचा कार्यकर्ता तुमच्या पक्षाला मिळाला आहे. तुमचे सगळे आमदार एका बाजूला उभे करा आणि आमच्या बाबर यांना एका बाजूला उभे करा. चिकाटीचा आणि वसंतदादांच्या तालमीत शिकलेला नेता तुम्ही मंत्रिमंडळात घ्यायला हवा होता.आ. पाटील यांच्या या भूमिकेचे राजकीय जाणकार वेगवेगळे अर्थ काढत आहेत. केवळ ३५ सेकंदाच्या या चित्रफितीने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकारणातील अनेक नेत्यांचे व्यक्तिगत संबंध असतात; पण थेट विधानसभेत आ. पाटील यांनी सत्तारूढ पक्षातील आमदार बाबर यांची बाजू घेतली. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून येथील कोणत्याच लोकप्रतिनिधीला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. मात्र येथील नेत्यांनी स्वकर्तृत्वावर या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.आ. पाटील यांच्या या भाषणामुळे बाबरप्रेमी खुशीत दिसत आहेत. मात्र त्याचवेळी जेव्हा राष्ट्रवादी -कॉँग्रेसची सत्ता होती, तेव्हा बाबर यांना मंत्रिपदाची संधी देण्यापासून कुणी रोखले होते, की त्यांचे कर्तृत्व आणि महत्त्व ते शिवसेनेत गेल्यावर कळाले? आमदार बाबर टेंभू योजनेच्या पाण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. पण आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात केवळ भाषणबाजीशिवाय व अनुशेषाचे कारण दाखवण्याशिवाय ठोस काय झाले, की केवळ शिवसेनेत असंतोष पसरावा, यासाठी बाबर कर्तृत्ववान असल्याचा साक्षात्कार आमदार पाटील यांना झाला, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAnil Baburअनिल बाबरSangliसांगली