शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Sangli: सलगरेतील भूसंपादनाविरोधात तरुणांनी अन्नपाणी त्यागले, लॉजिस्टिक पार्कसाठी शेती देण्याला विरोध

By संतोष भिसे | Updated: October 5, 2023 16:47 IST

दोघांची प्रकृती खालावली 

सांगली : सलगरे (ता. मिरज) येथील सुमारे ३०० एकर शेतजमीन मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यास आंबेडकरी समाजाने तीव्र विरोध दर्शविला आहे. नऊ तरुणांनी तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. त्यातील दोघांची प्रकृती खालावली आहे.सलगरे येथे मिरज रस्त्यावर पंपगृहानजिक ही जमीन आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी ती आंबेडकरी समाजाला कसण्यासाठी देण्यात आली. बॅकवर्ड क्लास सहकारी सामूदायिक शेती सोसायटी या नावाने मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या ताब्यात होती. २००५ मध्ये संस्थेची नोंदणी रद्द होऊन अवसायानात निघाली. शेतकऱ्यांच्या वारसांनी लेखापरिक्षण किंवा अन्य शासकीय प्रक्रिया पार पाडली नाही, त्यामुळे संस्थेची नोंदणी रद्द झाली. सध्या ती मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी देण्याचे घाटत आहे. एमआयडीसीने तसा प्रस्ताव नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंटला दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीवरील हक्क सोडावा, बेकायदेशीररित्या ताब्यात ठेऊ नये अशा स्वरुपाच्या नोटिसा जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या आहेत.याला सलगरेतील आंबेडकरी समाजाने आव्हान दिले आहे. धनराज कांबळे, मनोज  कांबळे, शंकर कांबळे, हिंदुराव कांबळे, रमेश कांबळे, शैलेश कांबळे, चन्नाप्पा कांबळे, ऋत्विक कांबळे या नऊ तरुणांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांना पाठिंब्यासाठी गावातून आंबेडकरी समाजाने गर्दी केली आहे. दरम्यान, हिंदुराव आणि ऋत्विक या दोघांची प्रकृती बुधवारी ढासळली. डॉक्टरांनी तपासणीअंती रुग्णालयात उपचार आवश्यक असल्याचे सांगितले, पण उपोषणकर्त्यांनी त्याला नकार दिला. सध्या ते आजारी अवस्थेतच उपोषण करत आहेत.

पार्क नाही, मग जमीन कशासाठी?आंबेडकरी समाजाने माहिती अधिकारात विचारणा केली असता, पार्कसाठीच्या थेट खरेदीने जमीन संपादित करण्याच्या प्रस्तावात या शेतकऱ्यांच्या जमिनीचा उल्लेख नाही असे उत्तर प्रशासनाने दिले होते. जमीन सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीत मात्र ही जमीन लॉजिस्टिक पार्कसाठी एमआयडीसीने प्रस्तावित केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ही जमीन पार्क किंवा अन्य कोणत्याही उद्योगासाठी संपादित करु नये अशी आंदोलकांची मागणी आहे.  

सलगरेमध्ये लॉजिस्टिक नसल्याचे उत्तरदरम्यान, जानराववाडी (ता. मिरज) येथील डॉ. दत्ताजीराव कुंडले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रबंधनला माहिती अधिकारात विचारणा केली असता, केंद्र सरकारने देशभरात ३५ ठिकाणी मंजूर केलेल्या जागांमध्ये सलगरेचा समावेश नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या जागेच्या संपादनाचे कारण काय? असा प्रश्न पुढे येत आहे.

टॅग्स :Sangliसांगली