शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sangli: बेडग येथील आंबेडकरी समाजाने पुन्हा गाव सोडले, माणगाव ते मुंबई लॉंग मार्च

By संतोष भिसे | Updated: September 11, 2023 19:03 IST

प्रशासनाने फसविल्याचा आरोप

बेडग : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी येथील आंबेडकरी समाजाने सोमवारी पुन्हा मुंबईकडे लॉंग मार्चसाठी कूच केले. माणगाव (ता. हातकणंगले) येथून मुंबईला पायी जाण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव गावातून सकाळी  रवाना  झाले.दरम्यान, आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अधिकाऱ्यांची विनंती व आवाहन त्यांनी झुगारुन लावले. कमानीचा पेटलेला वाद तीन महिन्यांपासून धुमसतच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमीन शासनातर्फे उभी करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थांनी त्याविरोधात भूमिका घेतली. गावात कोणत्याही महापुरुषाच्या नावे स्वागत कमान उभी करायची नाही असा ठराव केला. त्यामुळेही वाद पुन्हा पेटला आहे.

दोन महिन्यांपूर्वीही आंबेडकरी समाज बेडगमधून मुंबईकडे निघाला होता. पण मुंबईतील बैठकीत फडणवीस कमान पुन्ही उभी करण्याचे आणि संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुन्हे दाखल झाले, पण कमानीची पूर्तता होऊ शकली नाही. याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. कमानीएएवजी गावात मोठी अभ्यासिका उभी करु, पण लॉंग मार्च काढू नका असे ग्रामपंचायतीचे आवाहन आंदोलकांनी झुगारुन लावले आहे.सोमवारी सकाळी सुमारे २५० ते ३०० महिला-पुरुष आंदोलक मार्चसाठी गावातून रवाना झाले. निळे झेंडे घेतलेले व निळ्या टोप्या घातलेले महिला व तरुण सहभागी झाले होते. स्वतंत्र वाहनातून निर्णायक आंदोलनाच्या तयारीने ते गावातून रवाना झाले आहेत. प्रशासनाने वेळोवेळी फसवणूक केली आहे, त्यामुळे कमान उभी राहत नाही, तोपर्यंत गावात येणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. माणगाव येथे दुपारी तीन वाजता सभा  आयोजित केली  होती.  त्यानंतर मंगळवारी सकाळी तेथूनच मुंबईसाठी चालत रवाना होणार आहेत. 

 प्रशासनाचे आवाहन झिडकारलेआंबेडकरी समाज गाव सोडून जाताना पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संध्या जगताप, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी त्यांची विनंती व आवाहन मान्य केले नाही. माजी उपसरपंच सचिन पाटील, नंदकुमार शिंदे, परशुराम नागरगोजे, मनोज मुंडगनूर, शिवाप्पा आवटी, महेश कणसे, बाळासाहेब शिंदे आदींनीही समजाविण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

प्रशासनाने फसविल्याचा आरोपआंदोलकांचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आरोप केला की, प्रशासनाने वेळोवेळी आमची फसवणूक केली. यापुढे कोणाशीही चर्चा करणार नाही. कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी समाजाची फसवणूक केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज