शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:40 IST

श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबळीराजा स्मृती धरणाचा वर्धापनदिनराज्य संघटक मोहनराव यादव म्हणाले, राज्यातील दुष्काळी भागाला आदर्शवत ठरावे असे बळीराजा धरण आहे

आळसंद : श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे. हे यश चळवळीच्या रेट्यामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

बलवडी-तांदळगाव (ता. खानापूर) येथे बळीराजा जलसंवर्धन विकास संस्थेतर्फे बळीराजा धरणाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यावेळी पाटणकर बोलत होते. यावेळी राज्य संघटक मोहनराव यादव, दिलीप पाटील, गेल आॅमवेट उपस्थित होते.राज्य संघटक मोहनराव यादव म्हणाले, राज्यातील दुष्काळी भागाला आदर्शवत ठरावे असे बळीराजा धरण आहे. हे धरण म्हणजे परिवर्तनीय चळवळीचा पाया आहे. टेंभू व ताकारी योजनेचे पाणी समन्यायी पध्दतीने देण्याचे धोरण हाती घेणार आहे.

यावेळी दिलीप पाटील, अ‍ॅड. कृष्णा पाटील, आनंदराव पाटील, मारूती शिरतोडे, डॉ. संजय कांबळे, अजित खराडे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे परशुराम माळी, देवकुमार दुपटे, विलास चव्हाण, दाजी देशमुख, अनिल दुपटे, पांडुरंग चव्हाण, धम्मसागर भारती, दीपक पाटील, उत्तम चव्हाण, राजू राजे, शैलेंद्र दुपटे, सागर गोतपागर, विक्रम चव्हाण, सुरेश चव्हाण उपस्थित होते.मच्छिंद्र पवार यांनी स्वागत केले. रघुनाथ पवार यांनी आभार मानले.डिसेंबरमध्ये पुन्हा आंदोलनडॉ. पाटणकर म्हणाले, आटपाडीला बंद पाईपलाईनद्वारे टेंभू योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तो पॅटर्न राज्यभर स्वीकारावा, यासाठी डिसेंबरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण