शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

अमृत योजनेच्या ठेक्यामागे सर्वपक्षीय हात

By admin | Updated: July 15, 2017 23:53 IST

अमित शिंदे : बेकायदेशीर मंजुरीविरोधात लढा उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क  --सांगली : महापालिकेने मंजूर केलेल्या अमृत योजनेतील मिरज पाणीपुरवठ्याच्या ठेक्यामागे सर्वपक्षीय हात असून, याविरोधात आम्ही लढा उभारणार आहोत, अशी माहिती सांगली जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. शिंदे म्हणाले की, भाजपने या योजनेच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ हे ब्रीद खरे करून दाखविले आहे. सर्वांनाच त्यांनी योजनेच्या मंजुरीत सोबतीला घेतले आहे. ही योजना नागरिकांच्या कल्याणासाठी आहे की, नगरसेवकांच्या दुकानदारीसाठी आहे, याचा खुलासा शासनाने करावा. कारण नियमबाह्यरित्या जादा दराने आलेल्या निविदेवर शासनानेच शिक्कामोर्तब केले आहे. स्थानिक आमदार आणि खासदारही याबाबत मौन बाळगून आहेत. विरोधी पक्षाचीसुद्धा त्याला साथ आहे. त्यामुळे हा एक सर्वपक्षीय घोटाळा असल्याचेच दिसत आहे. नियमबाह्य कामात झालेला सर्वपक्षीय सहभागच संशयाला बळ देत आहे. योजनेतून नागरिकांचे कल्याणच होणार नाही. आर्किटेक्ट चव्हाण म्हणाले की, जादा दराने निविदा मंजूर केली असेल तर, कामाचे मूळ अंदाजपत्रक चुकले होते का, याचा खुलासा झाला पाहिजे. योजनेवर अवाढव्य खर्च करताना पाणीपट्टी किती लावण्यात येणार, त्याचा भुर्दंड नागरिकांना बसणार का किंवा कोणत्या आर्थिक गणितावर ही योजना कार्यान्वित होणार, याबाबत कोणताही खुलासा महापालिकेकडून झालेला नाही. जादा दराने निविदा दाखल करताना संबंधित ठेकेदाराने रेट अनालेसिस (दर विश्लेषण) दिले पाहिजे. ते दिलेले नाही. त्यामुळे निश्चितच यामागे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, हे दिसून येते. यावेळी प्रा. आर. बी. शिंदे, जयंत जाधव, तानाजी रुईकर, आसिफ मुजावर, नितीन मोरे, रवींद्र ढोबळे, अंकुर तारळेकर, सागर शिंदे, धीरज पोळ, मुकुंद भोरे, कौस्तुभ पोळ, अरुणा शिंदे, प्रा. राणी यादव आदी उपस्थित होते.खाबूगिरी पॅटर्नमुळे राज्यभर बदनामीआजवर मिरजेसाठी सर्वच योजना जादा दराने मंजूर झाल्या आहेत. तरीही येथील कामांचा दर्जा निकृष्टच राहिला आहे. महापालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांचा निधी मिरजेतील विविध विकासकामांवर खर्च होऊनही मिरजेत सर्वप्रकारचे प्रश्न आजही गंभीर अवस्थेत ठाण मांडून आहेत. मिरजेचे नाव नगरसेवकांच्या खाबूगिरी पॅटर्नमुळे बदनाम झाले आहे. परिणामी तिन्ही शहरांच्या बदनामीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहे. जनतेला सोबत घेऊन आम्ही याविरोधात लढा पुकारणार आहोत. सर्वप्रकारची आयुधे यासाठी वापरण्याची तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत अशाप्रकारची बेकायदेशीर कामे आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा अ‍ॅड. शिंदे यांनी यावेळी दिला.