शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

33 कोटी वृक्ष लागवडसाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:23 IST

सन 2019 साठी राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्याचे 72 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. पुढील तीन महिने ही मोहिम सुरू राहणार असून या मोहिमेमध्ये लावलेली रोपे जतन करण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, मंडळे, निसर्गप्रेमी या सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

ठळक मुद्दे33 कोटी वृक्ष लागवडसाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, तीन महिने मोहिम सुरू राहणार

सांगली : सन 2019 साठी राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्याचे 72 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. पुढील तीन महिने ही मोहिम सुरू राहणार असून या मोहिमेमध्ये लावलेली रोपे जतन करण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, मंडळे, निसर्गप्रेमी या सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या सन 2019 च्या पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात 72.29 लक्ष वृक्षलागवडीचा मुख्य कार्यक्रम मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर, भोसे येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपवनसंरक्षक (प्रा.) प्रमोद धानके, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, मिरज तहसिलदार शरद पाटील, कवठेमहांकाळ तहसिलदार शिल्पा ठोकडे, सरपंच सुहास पाटील, ग्राम वन संरक्षण समितीचे विविध सदस्य, विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम या वर्षी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्याला 72.29 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तीन महिने सुरू राहणाऱ्या या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत लावण्यात येणारी रोपे जतन करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषद या शासकीय यंत्रणांबरोबरच समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे.

सुमारे 220 टँकरव्दारे पाणी पुरवठा होत असलेल्या व अनेक चारा छावण्या सुरू असलेल्या, सातत्याने दुष्काळ व टंचाईग्रस्त असणाऱ्या सांगली जिल्ह्यासाठी वृक्ष लागवड मोहिमेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे याकडे केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता सर्वांनी एक चळवळ म्हणून पहावे. वृक्ष, निसर्ग यावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत म्हणाले, जिल्ह्यात 72 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यातील 23 लाख रोपे जिल्हा परिषदेमार्फत लावली जाण्यात येणार आहेत. 33 कोटी वृक्ष लाववडीची मोहिम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्यांने एका झाडवर आपल्या नावाची पाटी लावावी व या झाडाला पाणी घातल्याशिवाय जेवायचे नाही असा निश्चय करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.उपवनसंरक्षक (प्रा.) प्रमोद धानके प्रास्ताविकात म्हणाले, सांगली जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ 5 टक्के आहे. हे वाढविण्यासाठी वन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. कोणालाही झाडे लावावयाची असल्यास माहे जुलै ते सप्टेंबर महोत्सव कालावधीत वड, पिंपळ, जांभुळ, चिंच, आवळा, लिंबू, बांबू, पेरू, सिताफळ, शेवगा आदि प्रजातींची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी निसर्गप्रेमींनी याचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमात वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामपंचायत यासह 48 यंत्रणांचा सहभाग असून 72.29 लक्ष उद्दिष्टाच्या तुलनेत 77.90 लक्ष रोपे लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली