शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
5
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
6
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
7
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
8
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
9
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
10
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
11
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
12
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
13
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
14
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
15
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
16
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
17
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
18
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
19
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
20
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तिरंगा यात्रेतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन ३२५ फूट लांबीचा ध्वज : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:16 IST

सांगली : देशद्रोह, नक्षलवाद, जातीयवादामुळे समाजाचा उलट दिशेने सुरू असलेला प्रवास देशाच्या एकतेला बाधा आणणारा आहे

सांगली : देशद्रोह, नक्षलवाद, जातीयवादामुळे समाजाचा उलट दिशेने सुरू असलेला प्रवास देशाच्या एकतेला बाधा आणणारा आहे. त्यासाठीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सामाजिक तत्त्वांच्या अखंडतेसाठी सांगली शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली.

स्वामी विवेकानंद जयंती, जिजाऊ जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सांगलीत ३२५ फूट लांबीच्या तिरंग्याची यात्रा मंगळवारी आयोजित केली होती. राममंदिर चौकातून निघालेल्या या यात्रेचा समारोप विश्रामबाग चौकात जाहीर सभेने झाला.

दि. १२ जानेवारीस स्वामी विवेकानंद जयंती ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती यादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवक सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा समारोप मंगळवारी तिरंगा यात्रेने झाला. यात्रेचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड यांच्याहस्ते झाला. यात्रेत राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. पुष्पराज चौक, मार्केट यार्ड, गेस्ट हाऊस मार्गे निघालेल्या या यात्रेचे मे. चंदुकाका सराफ, हॉटेल सिझन फोर व हॉटेल अ‍ॅम्बॅसिडर यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले.

प्रथमेश परूळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद बेळंके यांनी स्वागत केले. यावेळी दीपांजली पिसे, पायल कुंभोजे यांनी मनोगत व्यक्त केले. मिरज महानगर मंत्री बाहुबली छत्रे, उपेंद्र कुलकर्णी, जयदीप पाटील, प्रतीक पाटील, विशाल जोशी, वृषभ आळतेकर, स्वानंद पिसे, महेश खारकांडे, अमृता बियाणी, श्रावणी शितीकर, रोहित राऊत, प्रा. निर्भय विसपुते, प्रवीण जाधव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.सबसे बडा राष्ट्रवाद...यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अभिजित पाटील म्हणाले, ‘ना माओवाद... ना नक्षलवाद... ना जातीयवाद... सबसे बडा राष्ट्रवाद’ या तत्त्वांचा पुरस्कार करण्याची अभाविपची भूमिका आहे. सामाजिक तत्त्वे व मूल्यांची जपणूक होण्यास या तिरंगा यात्रेद्वारे मदत होत आहे. देशद्रोही, समाजकंटकांना या माध्यमातून चपराक बसली आहे.

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारत