शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सांगलीत तिरंगा यात्रेतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन ३२५ फूट लांबीचा ध्वज : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:16 IST

सांगली : देशद्रोह, नक्षलवाद, जातीयवादामुळे समाजाचा उलट दिशेने सुरू असलेला प्रवास देशाच्या एकतेला बाधा आणणारा आहे

सांगली : देशद्रोह, नक्षलवाद, जातीयवादामुळे समाजाचा उलट दिशेने सुरू असलेला प्रवास देशाच्या एकतेला बाधा आणणारा आहे. त्यासाठीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सामाजिक तत्त्वांच्या अखंडतेसाठी सांगली शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली.

स्वामी विवेकानंद जयंती, जिजाऊ जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सांगलीत ३२५ फूट लांबीच्या तिरंग्याची यात्रा मंगळवारी आयोजित केली होती. राममंदिर चौकातून निघालेल्या या यात्रेचा समारोप विश्रामबाग चौकात जाहीर सभेने झाला.

दि. १२ जानेवारीस स्वामी विवेकानंद जयंती ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती यादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवक सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा समारोप मंगळवारी तिरंगा यात्रेने झाला. यात्रेचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड यांच्याहस्ते झाला. यात्रेत राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. पुष्पराज चौक, मार्केट यार्ड, गेस्ट हाऊस मार्गे निघालेल्या या यात्रेचे मे. चंदुकाका सराफ, हॉटेल सिझन फोर व हॉटेल अ‍ॅम्बॅसिडर यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले.

प्रथमेश परूळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद बेळंके यांनी स्वागत केले. यावेळी दीपांजली पिसे, पायल कुंभोजे यांनी मनोगत व्यक्त केले. मिरज महानगर मंत्री बाहुबली छत्रे, उपेंद्र कुलकर्णी, जयदीप पाटील, प्रतीक पाटील, विशाल जोशी, वृषभ आळतेकर, स्वानंद पिसे, महेश खारकांडे, अमृता बियाणी, श्रावणी शितीकर, रोहित राऊत, प्रा. निर्भय विसपुते, प्रवीण जाधव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.सबसे बडा राष्ट्रवाद...यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अभिजित पाटील म्हणाले, ‘ना माओवाद... ना नक्षलवाद... ना जातीयवाद... सबसे बडा राष्ट्रवाद’ या तत्त्वांचा पुरस्कार करण्याची अभाविपची भूमिका आहे. सामाजिक तत्त्वे व मूल्यांची जपणूक होण्यास या तिरंगा यात्रेद्वारे मदत होत आहे. देशद्रोही, समाजकंटकांना या माध्यमातून चपराक बसली आहे.

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारत