शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्यात कृषी क्षेत्र घटले :- म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याचे चुकीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:13 IST

सदानंद औंधे । मिरज : उन्हाळ्यात मिरज पूर्व भागातील गावात पाणीटंचाई तीव्र आहे. म्हैसाळ योजना सुरू असतानाही तालुक्यातील काही ...

ठळक मुद्देशेतीला पाणीटंचाईचा फटका

सदानंद औंधे ।मिरज : उन्हाळ्यात मिरज पूर्व भागातील गावात पाणीटंचाई तीव्र आहे. म्हैसाळ योजना सुरू असतानाही तालुक्यातील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणी टंचाईमुळे पिकांच्या लागवडीत घट झाली आहे. यामुळे यावर्षी कृषी उत्पादनात ५० टक्क्यांची घट होणार आहे. पूर्व भागातील अनेक गावांत पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.

मिरज तालुक्यात ६४ गावे असून, यापैकी नदीकाठावरील गावे वगळता पूर्व भागातील सुमारे २५ गावांत पाण्याची समस्या आहे. म्हैसाळ योजना कार्यान्वित झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत मिरज पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. मात्र म्हैसाळचे अपूर्ण पोटकालवे व पाणी वाटपाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका शेतीला बसला आहे.

पाणी टंचाईमुळे खरीप हंगामात ५४ टक्के व रब्बी हंगामात ५३.६६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाण्याची कमतरता असल्याने लागवड झालेल्या क्षेत्रातील कृषी उत्पन्नातही घट होणार आहे. पश्चिम भागात नदीकाठच्या गावातील ऊस, सोयाबीन, भुईमूग, हरभरा, मका, मूग, उडीद या पिकांना पाणीटंचाईचा फटका बसलेला नाही. मात्र पूर्व भागात म्हैसाळ योजना सुरू असतानाही या गावात पीक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक गावात पिण्याचे पाणी आठ दिवसातून एकदा मिळत असल्याने त्याचा शेतीवर परिणाम झाला आहे.

रब्बी ज्वारीचे २३ हजार हेक्टर क्षेत्र असताना १६ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी व खरीप ज्वारीचे ३८५ हेक्टर क्षेत्र असताना केवळ ३८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १० टक्के क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे ३१ हजार हेक्टर ऊस क्षेत्रापैकी ५ हजार ६०० हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. १३ हजार हेक्टर मक्याचे क्षेत्र असताना, ९ हजार हेक्टर पेरणी झाली आहे. याचप्रमाणे मूग, उडीद या कडधान्यांची ५२ टक्के व हरभऱ्याची २६ टक्के, भुईमुगाची ४४ टक्के, तर सोयाबीनची ४२ टक्के पेरणी झाली आहे.यावर्षी तुरीचे क्षेत्र केवळ २२ टक्के आहे. पाणीटंचाईचा फळपिकांवर मोठा परिणाम झाला असून, खरीप हंगामात ५ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १७ हेक्टर क्षेत्रात लागवड झाल्याने फळांचे उत्पादन घटले आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सिंचनासाठी देण्यात येत आहे.

मात्र तांत्रिक बिघाडामुळे योजना महिनाभर बंद पडल्याने भोसे, कळंबी, पाटगाव, सांबरवाडी, गवळेवाडी परिसरासह कालव्याच्या क्षेत्रातील गावातील पिकांना फटका बसला आहे.पोटकालव्यांतून अनियमित पाणीतालुक्याच्या उत्तर भागात सोनी, भोसे, कळंबी, पाटगाव, सांबरवाडी, खरकटवाडी, कांचनपूर परिसरात म्हैसाळच्या पोटकालव्यांतून अनियमित पाणी मिळत असल्याने या परिसरातील शेतीवर परिणाम झाला आहे. म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची कामे अपूर्ण असल्याने सिंचनासाठी पाणी टंचाईची समस्या आहे. यावर्षी मिरज तालुक्यात अनेक गावांत पाणी टंचाईमुळे लागवडीत सरासरी ५० टक्के घट झाल्याने कृषी उत्पन्नातही मोठी घट होणार आहे.मिरज तालुक्यात मका हेक्टरी २५ क्विंटल, भुईमूग ७ क्विंटल, मूग, उडीद हेक्टरी ६ क्विंटल व उसाचे हेक्टरी ८५ टन सरासरी उत्पादन होते. मात्र यावर्षी पाणी टंचाईमुळे हेक्टरी उत्पादनातही घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी