शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्यात कृषी क्षेत्र घटले :- म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याचे चुकीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:13 IST

सदानंद औंधे । मिरज : उन्हाळ्यात मिरज पूर्व भागातील गावात पाणीटंचाई तीव्र आहे. म्हैसाळ योजना सुरू असतानाही तालुक्यातील काही ...

ठळक मुद्देशेतीला पाणीटंचाईचा फटका

सदानंद औंधे ।मिरज : उन्हाळ्यात मिरज पूर्व भागातील गावात पाणीटंचाई तीव्र आहे. म्हैसाळ योजना सुरू असतानाही तालुक्यातील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणी टंचाईमुळे पिकांच्या लागवडीत घट झाली आहे. यामुळे यावर्षी कृषी उत्पादनात ५० टक्क्यांची घट होणार आहे. पूर्व भागातील अनेक गावांत पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.

मिरज तालुक्यात ६४ गावे असून, यापैकी नदीकाठावरील गावे वगळता पूर्व भागातील सुमारे २५ गावांत पाण्याची समस्या आहे. म्हैसाळ योजना कार्यान्वित झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत मिरज पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. मात्र म्हैसाळचे अपूर्ण पोटकालवे व पाणी वाटपाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका शेतीला बसला आहे.

पाणी टंचाईमुळे खरीप हंगामात ५४ टक्के व रब्बी हंगामात ५३.६६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाण्याची कमतरता असल्याने लागवड झालेल्या क्षेत्रातील कृषी उत्पन्नातही घट होणार आहे. पश्चिम भागात नदीकाठच्या गावातील ऊस, सोयाबीन, भुईमूग, हरभरा, मका, मूग, उडीद या पिकांना पाणीटंचाईचा फटका बसलेला नाही. मात्र पूर्व भागात म्हैसाळ योजना सुरू असतानाही या गावात पीक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक गावात पिण्याचे पाणी आठ दिवसातून एकदा मिळत असल्याने त्याचा शेतीवर परिणाम झाला आहे.

रब्बी ज्वारीचे २३ हजार हेक्टर क्षेत्र असताना १६ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी व खरीप ज्वारीचे ३८५ हेक्टर क्षेत्र असताना केवळ ३८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १० टक्के क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे ३१ हजार हेक्टर ऊस क्षेत्रापैकी ५ हजार ६०० हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. १३ हजार हेक्टर मक्याचे क्षेत्र असताना, ९ हजार हेक्टर पेरणी झाली आहे. याचप्रमाणे मूग, उडीद या कडधान्यांची ५२ टक्के व हरभऱ्याची २६ टक्के, भुईमुगाची ४४ टक्के, तर सोयाबीनची ४२ टक्के पेरणी झाली आहे.यावर्षी तुरीचे क्षेत्र केवळ २२ टक्के आहे. पाणीटंचाईचा फळपिकांवर मोठा परिणाम झाला असून, खरीप हंगामात ५ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १७ हेक्टर क्षेत्रात लागवड झाल्याने फळांचे उत्पादन घटले आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सिंचनासाठी देण्यात येत आहे.

मात्र तांत्रिक बिघाडामुळे योजना महिनाभर बंद पडल्याने भोसे, कळंबी, पाटगाव, सांबरवाडी, गवळेवाडी परिसरासह कालव्याच्या क्षेत्रातील गावातील पिकांना फटका बसला आहे.पोटकालव्यांतून अनियमित पाणीतालुक्याच्या उत्तर भागात सोनी, भोसे, कळंबी, पाटगाव, सांबरवाडी, खरकटवाडी, कांचनपूर परिसरात म्हैसाळच्या पोटकालव्यांतून अनियमित पाणी मिळत असल्याने या परिसरातील शेतीवर परिणाम झाला आहे. म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची कामे अपूर्ण असल्याने सिंचनासाठी पाणी टंचाईची समस्या आहे. यावर्षी मिरज तालुक्यात अनेक गावांत पाणी टंचाईमुळे लागवडीत सरासरी ५० टक्के घट झाल्याने कृषी उत्पन्नातही मोठी घट होणार आहे.मिरज तालुक्यात मका हेक्टरी २५ क्विंटल, भुईमूग ७ क्विंटल, मूग, उडीद हेक्टरी ६ क्विंटल व उसाचे हेक्टरी ८५ टन सरासरी उत्पादन होते. मात्र यावर्षी पाणी टंचाईमुळे हेक्टरी उत्पादनातही घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी