शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

शेतीस खात्रीचे पाणी, बेरोजगारांना हवे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 16:30 IST

‘मागणं लई न्हाई’ म्हणणाºया सांगलीकरांना फक्त  पाणी आणि रोजगाराची साधने दिली तरी, जिल्ह्याचा विकासरथ गतिमान करण्याची धमक त्यांच्यात आहे. प्रश्न आहे तो या मागण्यांचा एकत्रित आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचा. हीच अपेक्षा महाविकास आघाडीकडून आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील, विश्वजित कदम या, विकास कामांचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्या नेत्यांकडून सांगलीच्या विकासात निश्चितच भर पडेल.

संतोष भिसे  ।सांगली : लाल दिव्याची अपूर्वाई कधीच नसणाºया सांगली जिल्ह्याला भाजप सरकारमध्येही राज्यमंत्री आणि शेवटच्या टप्यात कॅबिनेट मंत्रीपदही मिळाले. आता नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये किमान तीन मंत्रिपदांची आशा आहे. त्यामुळे सांगलीकरांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.  शेतीला पाणी आणि हाताला रोजगार, या मूलभूत अपेक्षांची पूर्ती होणार काय, याकडे लक्ष असेल.  

दुष्काळी पूर्व भाग व सधन प्ािश्चम भाग, अशी दुहेरी वाटचाल करणाºया या जिल्ह्यात त्या-त्या तालुक्यांचे प्रश्न विविधांगी आहेत. त्यांचा अभ्यास असणा-या लोकप्रतिनिधींकडे आता सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. त्यामुळे या समस्यांवरची धूळ झटकली जाण्याची अपेक्षा आहे. महामार्गांचा विकास, सिंचन योजनांची पूर्तता, औद्योगिक वसाहतींचे पुनरुज्जीवन, शेतीमालासाठी हक्काच्या  बाजारपेठा, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, दळणवळणाच्या सुविधा हे नेहमीचेच, परंतु दुर्लक्षित प्रश्न महाविकास आघाडी सोडवेल, अशी सांगलीकरांना अपेक्षा आहे.

‘मागणं लई न्हाई’ म्हणणाºया सांगलीकरांना फक्त  पाणी आणि रोजगाराची साधने दिली तरी, जिल्ह्याचा विकासरथ गतिमान करण्याची धमक त्यांच्यात आहे. प्रश्न आहे तो या मागण्यांचा एकत्रित आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचा. हीच अपेक्षा महाविकास आघाडीकडून आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम या, विकास कामांचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्या नेत्यांकडून सांगलीच्या विकासात निश्चितच भर पडेल.

टॅग्स :DamधरणWaterपाणीjobनोकरीPoliticsराजकारण