शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल उधार, शेतकरी बेजार

By admin | Updated: November 16, 2016 23:21 IST

सांगली बाजार समितीतील स्थिती

७0 कोटींची उलाढाल जुन्या नोटांच्या गोंधळामुळे झाली ठप्प व्यापाऱ्यांना उधारीवर माल देऊन उत्पादक ‘सलाईन’वर सांगली : हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांकडील सोयाबीन, मका, कांदा, गुळाची खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत, तर काही व्यापारी पैसे महिन्याने देण्याचा वायदा करत आहेत. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतकरी माल विकत आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, विष्णुअण्णा फळमार्केट, पशुधन खरेदी-विक्रीची मागील तीन दिवसात ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. सध्या सोयाबीन, मका बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत आहे. परंतु, व्यापाऱ्यांकडे चलन नसल्यामुळे ते माल खरेदी करत नाहीत. हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा हा परिणाम आहे. किरकोळ बाजारात या मालास ग्राहक नसतो. त्यामुळे शेतीमाल हातात असूनही शेतकऱ्यांकडे रोजच्या खर्चासाठी पैसे नसल्याचे चित्र आहे. आटपाडी, जत, खानापूर, कडेगाव तालुक्यात कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे. कांदा काढून तयार आहे, पण पैसे नसल्यामुळे विक्रीसाठी कांदा आणू नका, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे, तर काही शेतकऱ्यांचा कांदा उधारीवर खरेदी करत असल्याचे व्यापारी मोहन माने यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेकडून पैसेच मिळत नाहीत. आम्ही खरेदी केलेला कांदा अन्य बाजारपेठेत पाठवतो. त्या व्यापाऱ्यांकडेही नवीन चलन उपलब्ध नाही. यामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. कांदा नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान नको, म्हणून आम्ही खरेदी करीत आहोत, पण हे व्यवहारही उधारीवरच सुरू आहेत. विष्णुअण्णा फळमार्केटमधील ७० ते ८० लाखांची रोजची उलाढाल ठप्प झाल्याचेही माने यांनी सांगितले. सांगली मार्केट यार्डातील रोजचे पंधरा ते वीस कोटींचे अन्नधान्य, सोयाबीन, गूळ, मका खरेदीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या किरकोळ व्यवहार व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावरच सुरू असल्याचे चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष गोपाळ मर्दा यांनी सांगितले. बाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार, विष्णुअण्णा फळमार्केट येथील ३५ टक्के, पशुधन विक्री बाजारामधील ४० टक्के आणि सांगली मार्केट यार्डातील ५० टक्के उलाढाल बंद असल्याचे सांगण्यात आहे. हजार-पाचशे रूपयांचे चलन बंद केल्यामुळे तीन्ही बाजारपेठेतील तीन दिवसांमध्ये ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकरी, व्यापारी व ग्राहकांकडे चलन फिरते राहिल्याशिवाय उलाढाल वाढणार नाही, अशीच परिस्थिती आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी शासनाने नवीन चलन हवे तेवढे देण्याची व्यवस्था केली पाहिजे, अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.(प्रतिनिधी) हमालांची उपासमार सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, विष्णुअण्णा फळमार्केट, गणपती पेठ येथील उलाढालीवरच हमालांच्या हाताला काम मिळत असते. परंतु, गेल्या चार दिवसांपासून सांगली बाजारपेठेतील उलाढालच घटली आहे. त्यामुळे हमालांच्या हातालाही काम नसल्यामुळे त्यांना रोज रिकाम्या हातानेच घरी परत फिरावे लागत आहे. रोजच्या कमाईवरच काही हमालांचा संसाराचा गाडा चालू असतो. परंतु, चार दिवसात त्यांच्या हातालाच काम नसल्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. बाजारपेठ सुरळीत कधी होणार आणि आपल्या हाताला काम कधी मिळणार?, असा प्रश्न हमालांना भेडसावत आहे.