शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही सकल मराठा समाजचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करणारे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्याकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये होत आहेत.

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करणारे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्याकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये होत आहेत. सरकारमधील काही मंत्री मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे मराठा समाजात संताप निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा वाळवा तालुका सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. आज, शनिवारी शहरात धरणे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या तालुका समन्वय समितीच्या कॉ. दिग्विजय पाटील, बी. जी. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना ३० जुलैरोजी सांगलीमध्ये येऊ देणार नाही आणि जर ते आलेच, तर त्यांचे कार्यक्रम उधळून लावणार. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रोखण्यात आले. मात्र त्यांनी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचा अहवाल फोडून पंढरपूरच्या वारीत साप सोडले जाणार होते, अशी माहिती दिली. कायद्याने अशी कोणतीही गुप्त माहिती सादर करता येत नाही.

पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचे आंदोलन ऐतिहासिक आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आजवर हिंसेला कधीही महत्त्व दिलेले नाही. आमचा अहिंसेवर विश्वास आहे. मात्र तरीही मोर्चामध्ये समाजकंटक घुसलेले आहेत, असे बेताल वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून होत आहे. भाजप, शिवसेना सरकारने आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत.ते म्हणाले, तोडफोड, जाळपोळीवरुन मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्याबाबत बदनाम करण्याचा डाव सत्ताधारी करत आहेत. ही बदनामी त्वरित थांबवावी. सांगली येथील महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना यायचे असेल, तर त्यांनी येतानाच मराठा आरक्षणाचा अध्यादेश सोबत आणावा.

मराठा समाजाला सरकारी, खासगी नोकरीत आरक्षण द्या, उद्योग—व्यवसायासाठी भांडवल पुरवठा करा, कौशल्य विकास, शेतीपूरक तंत्रज्ञानासाठी कर्ज आणि अनुदान द्या. त्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र कार्यालय सुरु करुन महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरु करावीत, असेही ते म्हणाले.यावेळी उमेश कुरळपकर, विजय महाडिक, सुयोग औंधकर, सागर जाधव उपस्थित होते.आज धरणे आंदोलनमराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी आज, शनिवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मराठा समाजाचे तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात दिवसभर ठिय्या मारणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणmarathaमराठा