शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

सांगली जिल्ह्यात नव्या पिढीतील राजकीय वारसदार सरस ठरणार?

By हणमंत पाटील | Updated: February 12, 2024 18:16 IST

हणमंत पाटील सांगली : गेल्या १० वर्षांत सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचे अकाली निधन झाल्याने राजकीय पोकळी निर्माण झाली. ‘ही ...

हणमंत पाटीलसांगली : गेल्या १० वर्षांत सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचे अकाली निधन झाल्याने राजकीय पोकळी निर्माण झाली. ‘ही पोकळी भरून काढण्याचे आव्हान’ नव्या पिढीतील युवा नेत्यांपुढे असल्याचा ‘लोकमत जागर’ ५ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला. त्यानंतर अनेक वाचकांचे फोन आले. या दिग्गज नेत्यांची नवी पिढी राजकीय वारसदार म्हणून पुढे येत आहे. हे युवा नेते केवळ वारसदार म्हणून सरस ठरणार का, त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल? याचा घेतलेला आढावा.

सांगली जिल्ह्याला स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचा राजकीय वारसा आहे; परंतु त्यानंतरच्या चार दशकात म्हणजे १९८५ ते २०२५ या काळात सांगलीचा एकही नेता मुख्यमंत्री होऊ शकला नाही. दरम्यान, २००४ ते २००८ या काळात आर. आर. पाटील आपल्या स्वकर्तत्वावर उपमुख्यमंत्री झाले; परंतु आर. आर. पाटील व डॉ. पतंगराव कदम यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. सांगलीचा नेता मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आव्हान आता नव्या पिढीपुढे आहे.आपल्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्याशी असलेली बांधीलकी कायम जपावी लागेल. केवळ राजकीय वारसदार म्हणून पुढील काळातील सुशिक्षित युवा मतदार तुम्हाला स्वीकारलेच असे नाही. जुन्या पिढीतील नेत्यांची सहानुभूती म्हणून तुम्हाला मतदारराजा एकदा संधी देईल; परंतु पुढील राजकीय वाटचाल तुम्हाला स्वकर्तृत्वावर करावी लागेल.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर युवानेते डॉ. विश्वजित ऊर्फ बाळासाहेब कदम यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळाली; परंतु त्यांची पुढील वाटचाल जनतेच्या विश्वासावर सुरू आहे. २०१९ च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. पुढील काळात युवा नेत्यांना राजकीय क्षेत्रातील पोकळी भरून काढण्याची मोठी संधी व आव्हान आहे.

वसंतदादा पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून तिसऱ्या पिढीतील युवानेते विशाल पाटील हे जनतेसमोर जात आहेत. गतपंचवार्षिक सांगली लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. तरीही ते खचून गेले नाहीत. आता केवळ राजकीय वारसदार म्हणून नाही, तर पुढील काळात स्वकर्तृत्व सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.आर. आर. आबा यांचे वारसदार म्हणून युवा नेते रोहित पाटील तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघाबरोबर राज्यभर फिरत आहेत. आबांच्या खास शैलीतील भाषणांना सोशल मीडियामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय; परंतु जनतेच्या मनातील आबांची प्रतिमा पाहता वारसदार ठरताना रोहित पाटील यांना स्वकर्तृत्व दाखवावे लागेल. त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहे. कारण जेवढा मोठा राजकीय वारसा, तेवढं मोठे आव्हान व तितकीच संधी या युवा नेत्यांपुढे आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून सत्यजित देशमुखराजकारणात आले. त्यांची वाटचाल जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून सुरू आहे. शिराळा विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. सध्या त्यांच्याकडे भाजपच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची प्रचारप्रमुख म्हणून धुरा आहे.राजकारणातील प्रदीर्घ अनुभव व जनतेशी नाळ असलेले आमदार अनिल बाबर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे त्याचा राजकीय वारसदार म्हणून सुहास बाबर यांचे नाव पुढे येत आहे. सुहास यांना जिल्हा परिषद सदस्य ते उपाध्यक्ष म्हणून राजकीय वाटचालीचा अनुभव आहे. अनिल भाऊ यांची सहानुभूती असली तरी पुढील काळात त्यांना स्वकर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे. दिग्गज नेत्यांच्या राजकीय वारसदारांना केवळ आपल्या मतदारसंघापुरता संकुचित विचार करून चालणार नाही. जिल्हा, महाराष्ट्र व देशाच्या विकासाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल करावी लागेल.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणVishwajeet Kadamविश्वजीत कदमRohit Patilरोहित पाटिलSatyajit Deshmukhसत्यजित देशमुख