शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

मिरज पूर्व भाग कर्नाटकास जोडा

By admin | Updated: June 12, 2014 00:49 IST

रस्तेप्रश्नी आंदोलकांची मागणी : आज गावे बंद; बहिष्काराचा इशारा

मिरज : चांगले रस्ते व म्हैसाळ योजनेचे पाणी देऊ शकत नसाल, तर आम्हाला कर्नाटक राज्याशी जोडा, अशी मागणी आज (बुधवारी) मिरज पूर्वभागातील सलगरेचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी केली. मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. उपोषणास पाठिंबा म्हणून गुरुवारी पूर्वभागातील सर्व गावांत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे यांनी दिली. मिरज पूर्वभागातील खराब रस्त्यांची दुरुस्ती व म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आमटवणे, खंडेराव जगताप, सलगरेचे तानाजी पाटील, बेळंकीचे वसंतराव गायकवाड, सोनीचे सरपंच दिनकर पाटील, लिंगनूरचे आर. आर. पाटील, रिपाइंचे अनिल कांबळे यांच्यासह पूर्वभागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. बुधवारी उपोषणाच्या दुसऱ्यादिवशी पूर्व भागातील ग्रामस्थांनी आंदोलकांची भेट घेऊ न पाठिंबा दिला. यावेळी सलगरेचे उपसरपंच तानाजी पाटील म्हणाले की, मिरज-सलगरे रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. वारंवार मागणी करूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हैसाळ योजनेचे पोटकालवे अपूर्ण असल्याने अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. महाराष्ट्रात राहून आम्हाला सोयी सुविधा मिळणार नसतील, तर पूर्वभाग कर्नाटकास जोडावा, अशी मागणीही तानाजी पाटील यांनी केली. आमटवणे म्हणाले की, रस्ते व पोटकालव्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पूर्वभागातील सर्व गावांत गुरुवारी बंद पाळण्यात येणार आहे. विजयनगरचे सरपंच राजू कोरे, अरुण कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)