शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

पलूसला शासकीय इमारतीत अस्वच्छता

By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST

सर्वत्र घाणीचे साम्राज्य : शौचालयांची दुरवस्था; पाण्याअभावी वापर बंद

किर्लोस्करवाडी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम मोहीम, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, डिजिटल तालुका, इको व्हिलेज या सर्व शासकीय योजनांमध्ये प्रभावीपणे काम करून राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या पलूस तालुक्याची मध्यवर्ती शासकीय इमारत मात्र अस्वच्छतेच्या गर्तेत आहे. घाणीने ग्रासलेल्या या इमारतीचे ग्रहण कधी सुटणार? याची चर्चा संपूर्ण तालुक्यातून विविध कामे घेऊन येणारे नागरिक करू लागले आहेत.पाच कोटी रुपये खर्च करून मध्यवर्ती इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व स्वच्छतागृहात इमारत वापरात आल्यानंतर केवळ काही महिनेच पाणी होते. त्यानंतर आजअखेर या इमारतीत पाण्याअभावी अस्वच्छता आहे. तसेच सर्व स्वच्छतागृहे कुलूपबंद व दुर्गंधी असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या इमारतीत दुय्यम निबंधक, भूिमअभिलेख, सामाजिक वनीकरण, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मंडल कृषी अधिकारी, कोषागार आदी कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांतून वर्गणी गोळा करुन पाण्याचे कनेक्शन होते. तेव्हा एका कामगाराद्वारे सर्व स्वच्छतागृहांची तसेच परिसराची (इमारतीची) साफसफाई केली जात होती. परंतु पाणी बंद झाल्यानंतर ही स्वच्छता २०११ पासून आजतागायत बंदच आहे. मात्र प्रत्येक कार्यालयातील कर्मचारी आपल्या कार्यालयातील स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु स्वच्छतागृहे व शौचालयामध्ये पाण्याचा वापर बंदच आहे. त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे. महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. पाण्यासाठी मध्यवर्ती इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पलूस तहसीलदार, बांधकाम विभागास तोंडी व लेखी निवेदन देऊन पाणी सुरू करण्यासाठी मागणी केली होती. परंतु याबाबत गंभीरपणे विचार होत नाही. लोकप्रतिनिधींनी कठोर भूमिका घेऊन इमारतीच्या या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)