शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

वन व गायरान जमिनी प्रश्नी राज्यव्यापी लढा उभारणार, आमदार भाई जयंत पाटलांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:20 IST

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लढा देण्यासाठी संयुक्त ताकद उभा करावी लागेल.

विटा : शेतकऱ्यांच्या शेती मालाला तीन पट हमी भाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असून तरुणांना कर्ज मिळण्यासाठी कौशल्या विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल, असे सांगून राज्यातील गायरान आणि वन जमिनीप्रश्नी राज्यव्यापी लढा उभा करून हा प्रश्न विधिमंडळात मांडणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागचे आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.भिवघाट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्यात आ. भाई जयंत पाटील बोलत होते. यावेळी महिला आघाडी प्रमुख निकिता देशमुख, भाई संपत पवार-पाटील, भाई बाबासाहेब कारंडे, भाई दादासाहेब बाबर, दिगंबर कांबळे, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई गोपीनाथ सूर्यवंशी उपस्थित होते.आ. जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लढा देण्यासाठी संयुक्त ताकद उभा करावी लागेल. येत्या काळात घाटमाथ्यावरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार असून राजकीयदृष्ट्या लागेल ती मदत केली जाईल.

पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई गोपीनाथ सूर्यवंशी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या. गायरान व वन जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याबरोबरच शेतकऱ्यांना १२ तास वीज द्यावी, शेतकऱ्यांच्या हद्दीत असलेल्या विजेच्या खांबाचे भूभाडे द्यावे तसेच मुद्रा व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मिळणारी कर्जे राष्ट्रीय बॅँकांच्या मुजारीमुळे तरुणांना मिळत नसल्याचा आरोप केला.यावेळी आ. भाई जयंत पाटील यांनी आगामी काळात शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न विधिमंडळात मांडणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करण्याची हाक दिली. या मेळाव्यात आ. भाई पाटील यांच्या उपस्थितीत शेकापच्या जिल्हा प्रवक्तेपदी गणेश धेंडे तसेच पुरोगामी युवक संघटनेच्या उपाध्यक्षपदी कुंडलचे संग्राम थोरबोले यांची निवड करण्यात आली.

भाई गणेश धेंडे यांनी स्वागत तर दिगंबर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास विनोद लगारे, सुनील हसबे, उत्तम यादव, संतोष यादव, प्रल्हाद माने, राजेंद्र माने, विजय सूर्यवंशी, अमित गिड्डे, भानुदास सूर्यवंशी, गणेश धेंडे, महानंद हसबे, तानाजी भोसले, शरद मुळीक, सचिन मुळीक, अभिजीत जाधव, तानाजी तुपे, संजीव पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रल्हाद माने यांनी आभार मानले.

टॅग्स :Sangliसांगली