शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

वन व गायरान जमिनी प्रश्नी राज्यव्यापी लढा उभारणार, आमदार भाई जयंत पाटलांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:20 IST

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लढा देण्यासाठी संयुक्त ताकद उभा करावी लागेल.

विटा : शेतकऱ्यांच्या शेती मालाला तीन पट हमी भाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असून तरुणांना कर्ज मिळण्यासाठी कौशल्या विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल, असे सांगून राज्यातील गायरान आणि वन जमिनीप्रश्नी राज्यव्यापी लढा उभा करून हा प्रश्न विधिमंडळात मांडणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागचे आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.भिवघाट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्यात आ. भाई जयंत पाटील बोलत होते. यावेळी महिला आघाडी प्रमुख निकिता देशमुख, भाई संपत पवार-पाटील, भाई बाबासाहेब कारंडे, भाई दादासाहेब बाबर, दिगंबर कांबळे, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई गोपीनाथ सूर्यवंशी उपस्थित होते.आ. जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लढा देण्यासाठी संयुक्त ताकद उभा करावी लागेल. येत्या काळात घाटमाथ्यावरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार असून राजकीयदृष्ट्या लागेल ती मदत केली जाईल.

पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई गोपीनाथ सूर्यवंशी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या. गायरान व वन जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याबरोबरच शेतकऱ्यांना १२ तास वीज द्यावी, शेतकऱ्यांच्या हद्दीत असलेल्या विजेच्या खांबाचे भूभाडे द्यावे तसेच मुद्रा व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मिळणारी कर्जे राष्ट्रीय बॅँकांच्या मुजारीमुळे तरुणांना मिळत नसल्याचा आरोप केला.यावेळी आ. भाई जयंत पाटील यांनी आगामी काळात शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न विधिमंडळात मांडणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करण्याची हाक दिली. या मेळाव्यात आ. भाई पाटील यांच्या उपस्थितीत शेकापच्या जिल्हा प्रवक्तेपदी गणेश धेंडे तसेच पुरोगामी युवक संघटनेच्या उपाध्यक्षपदी कुंडलचे संग्राम थोरबोले यांची निवड करण्यात आली.

भाई गणेश धेंडे यांनी स्वागत तर दिगंबर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास विनोद लगारे, सुनील हसबे, उत्तम यादव, संतोष यादव, प्रल्हाद माने, राजेंद्र माने, विजय सूर्यवंशी, अमित गिड्डे, भानुदास सूर्यवंशी, गणेश धेंडे, महानंद हसबे, तानाजी भोसले, शरद मुळीक, सचिन मुळीक, अभिजीत जाधव, तानाजी तुपे, संजीव पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रल्हाद माने यांनी आभार मानले.

टॅग्स :Sangliसांगली