शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सरपंचपद बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षीस, सांगलीतील 'या' गावांसाठी उद्योजकाची घोषणा

By श्रीनिवास नागे | Updated: November 29, 2022 17:05 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत होणारा लाखो रुपयांचा चुराडा, मतभेद टाळण्यासाठी अभिनव घोषणा

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीत मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग आणि खटाव गावांतील थेट सरपंचपद बिनविरोध केले, तर त्या गावांना एक लाखाचे बक्षीस देऊ, अशी घोषणा ब्रह्मा उद्योग समूहाचे प्रमुख मारुती माळी यांनी आज, मंगळवारी केली. ग्रामपंचायत निवडणुकीत होणारा लाखो रुपयांचा चुराडा टाळण्यासाठी व निवडणुकीच्या माध्यमातून गावागावांत गट-तट निर्माण होऊन होणारे मतभेद टाळण्यासाठी माळी यांनी ही अभिनव घोषणा केली आहे.गावाची एकी अबाधित राखण्यासाठी थेट सरपंचपद बिनविरोध केल्यास त्या गावांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही गावांत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनोख्या संकल्पनेत कोणती गावे यशस्वी ठरतात, हे लवकरच दिसून येणार आहे. माळी यांनी आजवर सामाजिक विधायक उपक्रमांना नेहमी अग्रक्रम दिला आहे. अनेक निराधारांना आधार दिला आहे.खटाव, बेडग आणि नरवाड या गावात ही संकल्पना रुजविण्यासाठी राजकीय नेत्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. थेट सरपंचपद बिनविरोध करून विकासकामांसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला मिळणार, ही संकल्पना स्थानिक राजकीय नेते कितपत उचलून धरणार, हे ७ डिसेंबरपर्यंत समजणार आहे.जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी काल, सोमवारी सुरू झाली. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सरपंच पदासाठी ५२, तर सदस्यांसाठी ४७ असे ९९ अर्ज दाखल झाले.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक