शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विस्तारित ‘म्हैसाळ’ची ९८१ कोटींची पहिली निविदा प्रसिद्ध

By अशोक डोंबाळे | Updated: January 14, 2023 17:06 IST

मुहूर्त सापडला : जतमध्ये दोन महिन्यात कामे सुरू करण्याच्या हालचाली

अशोक डोंबाळेसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांसाठी २००० कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कामाच्या पहिल्या टप्प्याची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या कामाची निविदा शुक्रवारी जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केली. कामांना प्रत्यक्षात दोन महिन्यात सुरुवात करण्याचे अधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत.

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ पैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. मात्र पूर्व भागातील ६५ गावे पाण्यापासून वंचित होती. त्यांना पाणी देण्यासाठी राज्य शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेमधून ‘जत उपसा सिंचन योजना’ नावाने प्रकल्प मंजूर केला आहे. मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी शासनाने १ हजार ९२८ कोटी रुपयांची तरतुद केली आहे.

टप्पा क्रमांक एक, दोन आणि तीन येथे पंपगृह, उर्ध्वगामी नलिका, टप्पा क्रमांक एक व दोनमधील जोड कालवे, बोगदा आदींच्या कामाची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या कामाची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध झाली. दि. २३ जानेवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत निविदा दाखल करणे आणि दि. २३ फेब्रुवारीला निविदा उघडण्यात येणार आहे. त्यानंतर कामाला तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे, असे सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता म. म. रासनकर यांनी सांगितले.चौकट

ठेकेदारांची लॉबी सक्रियकाही ठेकेदारांनी हे काम पदरात पाडून घेण्यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत ‘फिल्डिंग’ लावली आहे. ठराविक ठेकेदाराला काम कसे मिळेल, यासाठी काही अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक बडा ठेकेदार अन्य ठेकेदारांच्या माध्यमातून कामे घेण्याच्या प्रयत्नात आहे, अशी चर्चा आहे.

शेतकऱ्यांचे हित पहालोकप्रतिनिधी आणि राज्य शासन लक्ष देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च आंदोलन हाती घेऊन आवाज उठविल्यामुळे जाग आली आहे. यातूनच राज्य सरकारने योजनेचे काम सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे हित पाहण्याऐवजी शेतकऱ्यांचे हित पहावे, अशी अपेक्षा जतच्या शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :Sangliसांगली