शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे ८० कामगार सुदानमध्ये अडकले, सुटकेसाठी सरकारकडे साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 11:53 IST

आफ्रिका खंडातील सुदान देशात गेल्या काही दिवसांपासून गृहयुद्धाला सुरुवात

सांगली : आफ्रिका खंडातील सुदान देशात गेल्या काही दिवसांपासून गृहयुद्धाला सुरुवात झाली आहे. या देशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. तेथील साखर कारखान्यांमध्ये कामासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील ८० कामगारही अडकले आहेत. यात पलूस आणि तासगाव तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. त्यांनी तेथून सुटका करण्याची मागणी केली आहे.सुदानमध्ये गृहयुद्ध भडकत चालले असून, अनेक भारतीय तिथे अडकून पडले आहेत. यातील ३६० हून अधिकजणांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. मात्र अजूनही अनेकजण सुटकेच्या प्रतीक्षेत असून, त्यात सांगली जिल्ह्यातील काहींचा समावेश आहे.सूर्यगाव (ता. पलूस) येथील मधुकर पाटील यांच्या कुटुंबातील तीन व्यक्ती सुदानमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदानमधील केनाना शुगर कंपनीमध्ये हे सर्वजण कार्यरत आहेत. भारतीय दुतावासाच्या वतीने सुरू असलेल्या मदत क्षेत्रापासून ते अद्यापही बाराशे किलोमीटर दूर असल्याची माहिती आहे. यामुळेच त्यांनी एक व्हिडीओ तयार करून सुदानमधून सुटकेची मागणी भारत सरकारकडे केली आहे.युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतीयांना घेऊन जाण्यासाठी सुरू असलेल्या केंद्राजवळ पोहोचणे धोकादायक आहे, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. त्यामुळे सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पलूस, तासगाव तालुक्यांसह कर्नाटकातील उगार भागातील नागरिक तिथे आहेत.

जयंत पाटील यांची परराष्ट्र मंत्र्यांकडे मागणीराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना ट्विट करीत मदतीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील १०० जण सुदानमध्ये अडकले असून, त्यांच्यापर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही. आपल्या विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वांना सुरक्षितपणे भारतात आणले जावे.

‘लोकमत’चा थेट सुदानमध्ये संपर्कसुदानमध्ये असलेल्या तानाजी पाटील यांच्याशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, रबाक शहराशेजारी केनाना शुगर फॅक्टरी आहे. यात ३६४ भारतीय कामगार आहेत. यात सांगली जिल्ह्यातील किमान ८० जण आहेत. मदत केंद्रापासून हा कारखाना दूर असल्याने व बाहेरील वातावरणही असुरक्षित असल्याने मदत मिळण्यास अडचणी येत आहेत.

टॅग्स :Sangliसांगली