शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

जिल्ह्यात कोरोनाचे ६० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण सलग दुसऱ्या दिवशी अधिक आहे. पण मृत्यूचा दर मात्र जैसे थेच असून ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण सलग दुसऱ्या दिवशी अधिक आहे. पण मृत्यूचा दर मात्र जैसे थेच असून दिवसभरात जिल्ह्यातील ४६ व परजिल्ह्यातील १४ अशा ६० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात १२५८ नवे रुग्ण आढळून आले, तर २०२७ जण कोरोनामुक्त झाले. उपचाराखालील २३९६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. मंगळवारी वाळवा तालुक्यात सर्वाधिक २५७ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ४५, जत १५७, कडेगाव ९४, कवठेमहांकाळ ५३, खानापूर ६३, मिरज १२०, पलूस ९४, शिराळा १२९, तासगाव १०६, तर महापालिका क्षेत्रात सांगलीत ५६, मिरजेत ५४ असे १४० रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, जालना, कर्नाटकातील ९४ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दिवसभरात जिल्ह्यातील ४६ जणांचा मृत्यू झाला. त्यात कडेगाव १, पलूस २, मिरज तालुका ५, जत ४, खानापूर ६, तासगाव १०, वाळवा ९, कवठेमहांकाळ २, शिराळा तालुक्यातील ३ तर महापालिका क्षेत्रात सांगलीतील दोन, मिरजेतील एक व कुपवाडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील कर्नाटक ६, कोल्हापूर ४, सातारा २, सोलापूर २ अशा १४ जणांचाही कोरोनाने बळी घेतला.

सध्या २३९६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर जिल्ह्यातील २०२९ व जिल्ह्याबाहेरील ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या १७२५ चाचण्यात ४३८ पाॅझिटिव्ह तर अँटिजनच्या ४०५३ चाचण्यात ९१४ रुग्ण सापडले.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : १,०२,९०६

कोरोनामुक्त झालेले : ८५,५५३

आतापर्यंतचे मृत्यू : ३०१६

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली : ५६

मिरज : ५४

आटपाडी : ४५

जत : १५७

कडेगाव : ९४

कवठेमहांकाळ :५३

खानापूर : ६३

मिरज : १२०

पलूस : ९४

शिराळा : १२९

तासगाव : १०६

वाळवा : २५७