शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यातील ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षांनी दिली माहिती

By अशोक डोंबाळे | Updated: June 21, 2023 13:33 IST

शासनाने आधार कार्ड वैधताद्वारे संच मान्यता करण्याचा निर्णय घेऊन गोंधळ निर्माण केला

सांगली : शासनाने आधार कार्ड वैधताद्वारे संच मान्यता करण्याचा निर्णय घेऊन गोंधळ निर्माण केला आहे. त्यामुळे सुमारे २४ लाख विद्यार्थी संच मान्यता प्रक्रियेच्या बाहेर राहणार असल्यामुळे ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी यांनी दिली.महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबईत सत्कार केला. यावेळी महामंडळाचे कोषाध्यक्ष पाटील यांनी शिक्षण संस्थांसमोरील प्रश्न खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडले. यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल-पाटील, सरकार्यवाह विजय गवाणे, रवींद्र फडणवीस, आमदार चिमणराव पाटील, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. एन. डी. बिरनाळे, विनोद पाटोळे आदी उपस्थित होते.रावसाहेब पाटील म्हणाले, नवीन शिक्षक भरती प्रक्रियेचा बोजवारा उडणार आहे. थकीत वेतनेतर अनुदान, रखडलेली पवित्र पोर्टल प्रणालीची शिक्षक भरती, शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अन्यायकारक आकृतिबंध व रखडलेली शिक्षकेतर कर्मचारी भरती, वरिष्ठ महाविद्यालयाकडे १०० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती या प्रश्नांबाबत सरकार ठोस भूमिका घेत नाही. यामुळे शाळा, महाविद्यालये चालविणे शिक्षण संस्था चालकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन सोडविण्याची मागणी केली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सुप्रिया सुळेराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर महामंडळ शिष्टमंडळाची पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत शिक्षण संस्थांसमोरील प्रश्न मांडून सोडविण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करा : विजय नवल-पाटीलशिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल प्रणाली रद्द केली पाहिजे, थकीत वेतनेतर अनुदान वितरण करून पूर्वीप्रमाणे १२ टक्के वेतनेतर अनुदान मिळाले पाहिजे. संच मान्यता ही आधार कार्ड वैधता ऐवजी यूडायस नोंदणी प्रणालीवरच करण्याची गरज आहे. एकही शाळा बंद करून शिक्षक अतिरिक्त ठरवू नयेत. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावेत, अशा मागणीचा ठराव मुंबईतील शिक्षण संस्थांच्या बैठकीत केला आहे, अशी माहिती विजय नवल-पाटील यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक