शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

राज्यातील ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षांनी दिली माहिती

By अशोक डोंबाळे | Updated: June 21, 2023 13:33 IST

शासनाने आधार कार्ड वैधताद्वारे संच मान्यता करण्याचा निर्णय घेऊन गोंधळ निर्माण केला

सांगली : शासनाने आधार कार्ड वैधताद्वारे संच मान्यता करण्याचा निर्णय घेऊन गोंधळ निर्माण केला आहे. त्यामुळे सुमारे २४ लाख विद्यार्थी संच मान्यता प्रक्रियेच्या बाहेर राहणार असल्यामुळे ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी यांनी दिली.महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबईत सत्कार केला. यावेळी महामंडळाचे कोषाध्यक्ष पाटील यांनी शिक्षण संस्थांसमोरील प्रश्न खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडले. यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल-पाटील, सरकार्यवाह विजय गवाणे, रवींद्र फडणवीस, आमदार चिमणराव पाटील, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. एन. डी. बिरनाळे, विनोद पाटोळे आदी उपस्थित होते.रावसाहेब पाटील म्हणाले, नवीन शिक्षक भरती प्रक्रियेचा बोजवारा उडणार आहे. थकीत वेतनेतर अनुदान, रखडलेली पवित्र पोर्टल प्रणालीची शिक्षक भरती, शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अन्यायकारक आकृतिबंध व रखडलेली शिक्षकेतर कर्मचारी भरती, वरिष्ठ महाविद्यालयाकडे १०० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती या प्रश्नांबाबत सरकार ठोस भूमिका घेत नाही. यामुळे शाळा, महाविद्यालये चालविणे शिक्षण संस्था चालकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन सोडविण्याची मागणी केली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सुप्रिया सुळेराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर महामंडळ शिष्टमंडळाची पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत शिक्षण संस्थांसमोरील प्रश्न मांडून सोडविण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करा : विजय नवल-पाटीलशिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल प्रणाली रद्द केली पाहिजे, थकीत वेतनेतर अनुदान वितरण करून पूर्वीप्रमाणे १२ टक्के वेतनेतर अनुदान मिळाले पाहिजे. संच मान्यता ही आधार कार्ड वैधता ऐवजी यूडायस नोंदणी प्रणालीवरच करण्याची गरज आहे. एकही शाळा बंद करून शिक्षक अतिरिक्त ठरवू नयेत. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावेत, अशा मागणीचा ठराव मुंबईतील शिक्षण संस्थांच्या बैठकीत केला आहे, अशी माहिती विजय नवल-पाटील यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक