शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या व्यापाऱ्यांना 50 हजार रूपयांची मदत करणार- पालकमंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:19 IST

महापूराच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या बाजारपेठा व व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व व्यापाऱ्यांना उभारी देण्यासाठी शासन कटिबध्द असून छोट्या व्यापाऱ्यांना 50 हजार रूपयांच्या मर्यादेत मदत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, असे सांगून उद्योगाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा, असे निर्देश सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

ठळक मुद्देछोट्या व्यापाऱ्यांना 50 हजार रूपयांची मदत करणार- पालकमंत्री सुभाष देशमुखउद्योगाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा

सांगली : महापूराच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या बाजारपेठा व व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व व्यापाऱ्यांना उभारी देण्यासाठी शासन कटिबध्द असून छोट्या व्यापाऱ्यांना 50 हजार रूपयांच्या मर्यादेत मदत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, असे सांगून उद्योगाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा, असे निर्देश सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.पूरबाधित उद्योजक, लघु उद्योजक, छोटे व्यापारी यांच्या अडचणी, सूचना, मागण्या यावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर, महावितरणच्या संचालिका निता केळकर, दिपक शिंदे (म्हैसाळकर), सांगली, कोल्हापूर येथील उद्योजकांच्या विविध संघटना, कर सल्लागार, टॅक्सी युनियन, औषध व्यावसायिक, पान असोसिएशन, मेकॅनिकल असोसिएशन, रिक्षा युनियन आदि विविध घटकातील संघटनांच्या प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, महापूराच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महानगरपालिका, राज्य शासन व केंद्र शासन या सर्व स्तरावर उद्योग व व्यापाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. विमा कंपन्यांनी विशेष बाब म्हणून नैसर्गिक आपत्तीत व्यापाऱ्यांना मदत करणे आवश्यक असून त्यांचे विमा दावे लवकरात लवकर सकारात्मक पध्दतीने निकाली काढावेत यासाठी प्रयत्न करू असे सांगून व्यापाऱ्यांनीही विमा पॉलिसी उतरत असताना त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीला विमा संरक्षण मिळावे यासाठी आग्रही रहावे. जी औषधे पाण्यात भिजली आहेत ती औषधे औषध कंपन्यानी माघारी घेऊन त्यामोबदल्यात दुसरी औषधे द्यावीत याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.यावेळी विविध उद्योजकांच्या संघटनांमार्फत विमा कंपन्यांनी लवकरात लवकर विमा दावे निकाली काढावेत. घरपट्टी, पाणीपट्टी, जीएसटी भरण्यास मुदतवाढ मिळावी, नुकसानीचे पंचनामे तात्काळ व्हावेत, वीज बिल भरण्यास मुदतवाढ मिळावी, कर्जांच्या हप्त्यांचे पुनर्गठण व्हावे, वाहन योग्यता प्रमाणपत्राबाबतचा दंड माफ व्हावा, व्यापार, उद्योगाला दिलासा देण्यासाठी तातडीचे प्रयत्न व्हावेत, व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहे त्याबाबतचे पंचनामे लवकरात लवकर करून त्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या. 

 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली