शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

साडेतीन वर्षांत पन्नास हजार सांगलीकरांनी घेतला पासपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:33 IST

पर्यटनासाठी परदेशात सफर करण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पासपोर्टधारक सांगलीकरांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या साडेतीन वर्षात ५० हजार ७२६ सांगलीकरांनी पासपोर्ट काढला आहे.

ठळक मुद्देसांगलीकरांना खºयाअर्थाने परदेश वारीचे वेध लागले असल्याचे दिसत आहे

शरद जाधव ।सांगली : पर्यटनासाठी परदेशात सफर करण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पासपोर्टधारकसांगलीकरांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या साडेतीन वर्षात ५० हजार ७२६ सांगलीकरांनी पासपोर्ट काढला आहे.अनेकजण पर्यटनासाठी हमखास परदेश वारीचे नियोजन करत असतात. पर्यटन कंपन्यांकडून मिळणाºया आॅफर्स व इतरही कारणांनी गेल्या काही वर्षांपासून परदेशात जाणाºया सांगलीकरांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले व नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या तरूणांचे प्रमाण अधिक होते. आता मात्र, केवळ हौस म्हणून नव्हे, तर गरज म्हणूनही पासपोर्ट काढले जात आहेत. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य असल्याने अनेकजण तो काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

केंद्र सरकारने गेल्यावर्षीच सांगलीत पासपोर्ट सुविधा केंद्राचीही स्थापना केली आहे. त्याचाही फायदा होताना दिसत आहे. पूर्वी पासपोर्ट काढण्याची प्रक्रियाही किचकट व वेळकाढूपणाची होती. त्यामुळे अनेकांना इच्छा असतानाही पासपोर्ट काढता येत नव्हता. आता कागदपत्रांतील सुलभता, पोलीस पडताळणीतील अडचणी दूर केल्याने व अपॉर्इंटमेंटवर पासपोर्ट काढला जात असल्याने पैसा व वेळेचीही बचत होत आहे.

परदेशवारी म्हणजे केवळ उच्चभ्रूंसाठीच असल्याचा भ्रमही आता कमी होत आहे. जिल्ह्यातील अनेक तरूण, तरूणी शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. परदेशातील शिक्षणासाठी बॅँकांनीही मदतीचा हात दिल्याने जगभरातील नामवंत विद्यापीठांमध्ये जिल्ह्यातील तरूण शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच नोकरीसाठी अनेकजण परदेशाला पसंती देतात. विशेषत: आखाती देशांमध्ये नोकरीला प्राधान्य दिले जाते. काही वर्षापूर्वी मुंबई, पुणे अथवा देशातील एखाद्या मोठ्या शहरात नोकरीसाठी जाणारे, आता थेट परदेशाला पसंती देत असल्याने पासपोर्टला मागणी वाढली आहे.

जिल्ह्यातील उपक्रमशील शेतकरी कृषी अभ्यासासाठीही दौरे काढत असतात. शिवाय सांगली, मिरजेची ओळख असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर्सही परदेशात जात आहेत.वर्षातून एकदा पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने सांगलीकरांना खºयाअर्थाने परदेश वारीचे वेध लागले असल्याचे दिसत आहे.सधन तालुक्यांची भरारीपासपोर्टच्या संख्येचा विचार केला, तर जिल्ह्यातील सधन तालुक्यांतून सर्वाधिक पासपोर्ट काढले जात आहेत. सांगली, मिरज, वाळवा, पलूस या भागातून पासपोर्ट काढणाºयांची संख्या अधिक आहे. इतर भागातूनही तुलनेने अधिक नागरिक पासपोर्टसाठी अर्ज दाखल करत आहेत. 

सक्षम ओळखपत्र म्हणूनही पर्यायपरदेशात जाण्यासाठीच पासपोर्ट काढण्यात यावा, हा समज दूर होत असून सक्षम ओळखीचा पुरावा म्हणूनही अनेकजण पासपोर्ट काढून ठेवत आहेत. अनेकांचे परदेशात जायचे नियोजन नसतानाही, केवळ एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्टकडे पाहिले जात असल्यानेही पासपोर्ट काढला जात आहे.पासपोर्टधारकवर्ष संख्या२०१६ १०८७४२०१७ १५११८२०१८ १७६५१मे २०१९ अखेर ७११०एकूण ५०७२६

टॅग्स :Sangliसांगलीpassportपासपोर्ट