शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही

By अशोक डोंबाळे | Updated: March 1, 2025 14:26 IST

'खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळणार'

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील गेल्या १० वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील २१७ शाखांमधील एक लाख ९१ हजारांवर खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा केली आहे. या खात्यातील रकमेत बँकेतील कर्मचाऱ्यांकडूनच गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखाद्या बँकेतील खात्यावर सलग १० वर्षे एकदाही उलाढाल झाली नसेल ते खाते नॉन-वर्किंग होते. त्या खात्यावर असलेली शिल्लक रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते. जिल्ह्यातील सर्व शाखांतील एक लाख ९१ हजार १३२ खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपये विविध कारणांनी बंद असलेल्या खात्यांमध्ये होती. ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याबाबत जिल्हा बँकेला सूचना करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ७५ हजार ७५९ खातेदारांचे २० कोटी ४५ लाख आठ हजार, तर दुसऱ्या टप्प्यात एक लाख १५ हजार ३७३ खातेदारांची २९ कोटी चार लाख १९ हजार रुपये इतकी रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली. बंद खातेदारांच्या वारसांनी आवश्यक पुरावे असलेली कागदपत्रे आणून त्या खात्यावरील रक्कम काढून देण्याबाबत बँकेने ग्राहकांना कळविले होते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने खातेदारांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागली होती. संबंधित ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता करून बंद खात्यातील रक्कम काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले.

खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळतील : शिवाजीराव वाघरिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बंद खात्यातील खातेदारांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे जमा केले तरी ते संबंधित खातेदाराने अथवा त्यांच्या वारसांनी पुरावे दिल्यानंतर रक्कम परत मिळू शकते. ज्या बंद खात्यावरील पैसे गेले आहेत, त्या खातेदार आणि त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे जिल्हा बँकेला देण्याची गरज आहे. त्यानंतर त्यांची रक्कम संबंधित खातेदारांना दिली जाईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक