शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही

By अशोक डोंबाळे | Updated: March 1, 2025 14:26 IST

'खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळणार'

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील गेल्या १० वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील २१७ शाखांमधील एक लाख ९१ हजारांवर खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा केली आहे. या खात्यातील रकमेत बँकेतील कर्मचाऱ्यांकडूनच गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखाद्या बँकेतील खात्यावर सलग १० वर्षे एकदाही उलाढाल झाली नसेल ते खाते नॉन-वर्किंग होते. त्या खात्यावर असलेली शिल्लक रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते. जिल्ह्यातील सर्व शाखांतील एक लाख ९१ हजार १३२ खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपये विविध कारणांनी बंद असलेल्या खात्यांमध्ये होती. ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याबाबत जिल्हा बँकेला सूचना करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ७५ हजार ७५९ खातेदारांचे २० कोटी ४५ लाख आठ हजार, तर दुसऱ्या टप्प्यात एक लाख १५ हजार ३७३ खातेदारांची २९ कोटी चार लाख १९ हजार रुपये इतकी रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली. बंद खातेदारांच्या वारसांनी आवश्यक पुरावे असलेली कागदपत्रे आणून त्या खात्यावरील रक्कम काढून देण्याबाबत बँकेने ग्राहकांना कळविले होते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने खातेदारांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागली होती. संबंधित ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता करून बंद खात्यातील रक्कम काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले.

खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळतील : शिवाजीराव वाघरिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बंद खात्यातील खातेदारांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे जमा केले तरी ते संबंधित खातेदाराने अथवा त्यांच्या वारसांनी पुरावे दिल्यानंतर रक्कम परत मिळू शकते. ज्या बंद खात्यावरील पैसे गेले आहेत, त्या खातेदार आणि त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे जिल्हा बँकेला देण्याची गरज आहे. त्यानंतर त्यांची रक्कम संबंधित खातेदारांना दिली जाईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक