शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोनासह इतर आजारांमुळे ४७० विद्यार्थ्यांनी गमावले आई-वडील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या विळख्यासह इतर दुर्धर आजाराने वाळवा तालुक्यातील ४७० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या विळख्यासह इतर दुर्धर आजाराने वाळवा तालुक्यातील ४७० विद्यार्थ्यांच्या आई, वडिलांचे निधन झाले आहे. यातील सहा विद्यार्थ्यांच्या आई, वडिलांचे निधन झाल्याने ही मुले पूर्णत: निराधार बनली आहेत. कोविडमुळे १७७, तर इतर आजारांमुळे २९३ पालकांचे निधन झाले आहे.

कोविड व इतर आजारांमुळे पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पंचायत समितीमधील शिक्षण विभागाने संकलित केलेल्या माहितीतून ४७० विद्यार्थ्यांनी आपले पालक गमाविल्याचे समोर आले आहे. पालकांच्या निधनामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण ते शिकत असलेल्या शासकीय अथवा खासगी शाळेत नियमित सुरू ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

वाळवा तालुक्यामध्ये एकूण ६१ जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळा आहेत. यातील १०७ विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले आहे. खासगी अनुदानित शाळा ८७ असून त्यातील ३१५ विद्यार्थ्यांचे, तर स्वयं अर्थसाहाय्यित शाळांची संख्या २४ असून त्यातील ४८ विद्यार्थ्यांचे पालक कोविड व इतर आजारांमुळे दगावले आहेत.

६९ विद्यार्थ्यांच्या आईचा, तर ३९५ विद्यार्थ्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ही मुले अंशत: निराधार ठरली आहेत, तर ६ विद्यार्थ्यांचे आई, वडील दगाविल्याने ही मुले पूर्णत: निराधार झाली आहेत. कोविड किंवा इतर आजारामुळे मृत्यू झालेल्या वाळवा तालुक्यातील पालकांचा एकही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेला नाही. ४५४ विद्यार्थी आहे त्याच शाळेत शिकत असून, १६ विद्यार्थी हे शिकत असलेल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत उच्च वर्गात प्रवेशित झाले आहेत.