शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

सांगली जिल्ह्यामध्ये ४२५ तळीरामांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:59 PM

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ तळीराम सापडले आहेत. या तळीरामांविरुद्ध जिल्हा न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सर्व तळीरामांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दि. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसातील ही कारवाई आहे.लोकसभा निवडणुकीसाठी १० मार्चला आचारसंहिता लागली. तेव्हापासून जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये दररोज दहा ते बारा तळीराम सापडत आहेत. सांगली आणि मिरज वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईत आघाडीवर आहेत. तळीरामांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. वाहने जप्त केली जातात. दुसऱ्यादिवशी न्यायालयात खटले दाखल करून त्यांना हजर केले जाते. गुन्हा कबूल केल्यास दोन हजार रुपये दंड ठोठावला जातो. दंड भरल्याची पावती घेऊन ती पोलिसांना दाखविल्यानंतर जप्त केलेले वाहन सोडले जाते.दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडल्यानंतर अटकेची कारवाई, वाहन चालविण्याचा परवाना निलंबित, रद्द, हे उपाय तळीराम चालकांना अद्याप लागू पडलेले नाहीत. नशेत वाहन चालविल्याने अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करूनही फरक पडला नाही. अनेकदा पोलिसांना पाहून काही तळीराम अन्य मार्गाने पळून जाण्यात यशस्वी होतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलीस २४ तास रस्त्यावर आहेत. संशयित वाहने तपासली जात आहेत. त्यावेळी नशेत वाहन चालविणारे तळीराम सापडत आहेत. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसात ४२५ तळीराम सापडले आहेत.