शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

‘म्हैसाळ’च्या थकीत ४१ कोटी वसुलीचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: December 31, 2016 23:20 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विश्वास महत्त्वाचा : गाव पुढाऱ्यांच्या वसुलीकडेही लक्ष ठेवण्याची गरज

अशोक डोंबाळे--सांगली म्हैसाळ सिंचन योजनेचा लाभ मिरज ते सांगोल्यापर्यंत ३४ हजार ८६२ हेक्टर क्षेत्राला झाला आहे. या क्षेत्राला समान पाणीपट्टी आकारणी करून पारदर्शक पध्दतीने वसुली केल्यास शेतकरी पैसे भरण्यासाठी पुढे येतील. मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचण्याचीही गरज आहे. याचबरोबर पूर्वीच्या वसूल रकमेचा हिशेब अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिल्याशिवाय ४१ कोटींची थकीत पाणीपट्टी व्यवस्थापन विभागाला वसूल करणे जड जाणार आहे.म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर १७.४४ टीएमसी पाणी उचलण्याचे नियोजित आहे. यापैकी सध्या खरीप हंगामासाठी २.२२ टीएमसी आणि उन्हाळी हंगामासाठी ५.८० टीएमसी असे वर्षभरात ८.२ टीएमसी पाणी उचलले आहे. याचे वीज बिल २६ कोटी ४५ लाख ९६ हजार रुपये आले आहे. तसेच पूर्वीच्या वीज बिलाची दहा कोटी थकीत आहे. एकूण वीज बिलाची ३६ कोटी ४५ लाख ९६ हजार थकीत आहे. यापैकी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ६ कोटी ४१ लाख ४१ हजार रुपये शासनाकडून सवलत मिळाली आहे. उर्वरित ३० कोटी २८ लाख १३ हजार रुपये थकबाकीसाठी महावितरण कंपनीने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या सर्व विद्युत पंपांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यानंतर साखर कारखानदार आणि अन्य शेतकऱ्यांकडून सहा कोटी ४१ लाख ४१ हजार रुपये वसूल करून महावितरणकडे भरले आहेत. परंतु, महावितरण कंपनीकडून आकारण्यात आलेल्या दंडासहीत सध्या २५ कोटी १५ लाख ७३ हजार रुपये भरल्याशिवाय महावितरण कंपनी वीज पुरवठा सुरळीत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. योजनाच बंद असल्यामुळे शेतकऱ्यांकडूनही पाणीपट्टी वसुलीला फारसा प्रतिसाद दिसत नाही.मागील आठवड्यात महांकाली, मोहनराव शिंदे यांसह पाच साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन थकीत वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी पुढाकार घेतला होता; पण यासही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महावितरण कंपनीचे अधिकारी थकीत वीज भरल्याशिवाय योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करणार नाही. योजनेचे सोशल आॅडिट कराम्हैसाळ योजनेतील पाणीपट्टीचे लेखापरीक्षणच झाले नसल्याबद्दल शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले, शेतकरी संघटना कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष अशोक माने, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी म्हैसाळ पाणी व्यवस्थापन विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली. दोन लाखांचे व्यवहार असतील, तर त्या संस्थेचे लेखापरीक्षण करण्याची शासनाची सक्ती आहे. म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी, तर पंधरा वर्षांत ११ कोटी ३० लाख वसूल केली आहे. या निधीचे अधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण का केले नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या पावतीची प्रत पाटबंधारे विभागाकडे असणे गरजेचे असताना अधिकारी नाही म्हणतातच कसे, असा सवालही त्यांनी केला. योजनेच्या खर्चासह पाणीपट्टी वसुलीचे सोशल आॅडिट करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.रब्बी वाया, तरीही योजना बंदचमिरज पूर्व, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि सांगोला तालुक्यापर्यंत म्हैसाळ योजनेचा लाभ मिळतो. या तालुक्यांमध्ये मान्सून पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. येथील रब्बी हंगामातील पिके म्हैसाळ योजनेवरच अवलंबून होती. रब्बी हंगामातील बहुतांशी पेरण्या आॅक्टोबर महिन्यात झाल्या आहेत. येथील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी मिळेल, म्हणून रब्बीच्या १०० टक्के पेरण्या केल्या होत्या. सर्वांनी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पाणीपट्टीची रक्कम वसुलीसाठी पुढाकार घेतला असता, तर शेतकऱ्यांनी पाणीपट्टी दिली असती. परंतु, तसे कोणतेही ठोस प्रयत्न अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून झाले नाहीत.