शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दप्तरी सांगली जिल्ह्यात ११२ टक्के पाऊस : दुष्काळी भाग कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:25 IST

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे आहे.

ठळक मुद्देखानापूर तालुक्यात खरीप पेरण्या थांबल्या

सांगली : मान्सूनपूर्व आणि मान्सूनचा असा दोन्ही पाऊस जिल्ह्यात बरसलाच नसल्यामुळे जिल्ह्यात तलाव आणि विहिरी कोरड्या ठणठणीत आहेत. तरीही शासनाच्या पर्जन्यमान यंत्रावर मात्र जिल्ह्यात दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत सरासरी ११२ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. गंमत म्हणजे दुष्काळी भागामध्ये सध्या २५० च्यावर टँकर चालू असताना दुष्काळी तालुक्यात सरासरी १०० टक्केहून जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. एवढा पाऊस असतानाही खरीप पेरणीच्या पिकांनी मात्र माना टाकल्याचे दुष्काळी तालुक्यातील चित्र आहे.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे असल्याचे दिसत आहे. दरवर्षी साधारणपणे दि. २६ जुलैपर्यंत चांदोली धरण शंभर टक्के भरलेले असते. यावर्षी पावसाळा संपण्यास वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असताना चांदोली धरण केवळ ६० ते ६५ टक्केच भरलेले आहे. जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील तलाव आणि विहिरी सध्या कोरड्या ठणठणीत आहेत. दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत गेल्यावर्षी १२५.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १३.६ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे, असे शासकीय आकडेवारीवरुन दिसत आहे.

दि. १ जून ते २६ जुलै २०१९ यावर्षी मिरज तालुक्यात १४१ टक्के, जत १२५ टक्के, वाळवा ९३ टक्के, तासगाव १११ टक्के, शिराळा १०० टक्के, आटपाडी १२३ टक्के, कवठेमहांकाळ १५९ टक्के, पलूस ८५ टक्के, कडेगाव ११५ टक्के आणि सर्वात कमी खानापूर तालुक्यात ७० टक्के पाऊस झाल्याची नोंद पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाकडील पर्जन्यमापकावर झाली आहे. प्रत्यक्षात दुष्काळी भागाकडे पाहिल्यानंतर मात्र पावसाच्या आकडेवारीबद्दल शेतकऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. पाऊस पडला तर त्याचे पाणी कुठे गेले, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहे. कारण, आजही दुष्काळी भागातील तलाव कोरडे असून विहिरी आणि विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. खरिपाची पेरणी जिल्ह्यात जवळपास ९० टक्केहून जास्त झाली आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्यामुळे खरिपाची कोवळी पिके कोमेजू लागली आहेत.

चांदोली धरण : परिसरात पाऊसवारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाने दीड हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला, तर धरण ६५ टक्के भरले आहे. मुसळधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. शुक्रवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाच हजार २५१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासात ५२ मिलिमीटर पावसासह एकूण एक हजार ५१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाण्याची पातळी ६१३.२५ मीटर झाली असून पाणीसाठा २२.३६ टीएमसी झाला आहे. त्याची टक्केवारी ६५ आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरूच आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची हजेरीसांगली, मिरज शहरास जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने दिवसभर हजेरी लावली होती. रिमझिम सरी येत असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. शिराळा, वाळवा तालुक्यासह दुष्काळी काही गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांना पावसाने हुलकावणीच दिल्यामुळे दिली आहे. खरीप हंगाम वाया जाणार की काय, अशा चिंतेत शेतकरी सध्या दिसत आहे.