शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

शासकीय दप्तरी सांगली जिल्ह्यात ११२ टक्के पाऊस : दुष्काळी भाग कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:25 IST

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे आहे.

ठळक मुद्देखानापूर तालुक्यात खरीप पेरण्या थांबल्या

सांगली : मान्सूनपूर्व आणि मान्सूनचा असा दोन्ही पाऊस जिल्ह्यात बरसलाच नसल्यामुळे जिल्ह्यात तलाव आणि विहिरी कोरड्या ठणठणीत आहेत. तरीही शासनाच्या पर्जन्यमान यंत्रावर मात्र जिल्ह्यात दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत सरासरी ११२ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. गंमत म्हणजे दुष्काळी भागामध्ये सध्या २५० च्यावर टँकर चालू असताना दुष्काळी तालुक्यात सरासरी १०० टक्केहून जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. एवढा पाऊस असतानाही खरीप पेरणीच्या पिकांनी मात्र माना टाकल्याचे दुष्काळी तालुक्यातील चित्र आहे.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे असल्याचे दिसत आहे. दरवर्षी साधारणपणे दि. २६ जुलैपर्यंत चांदोली धरण शंभर टक्के भरलेले असते. यावर्षी पावसाळा संपण्यास वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असताना चांदोली धरण केवळ ६० ते ६५ टक्केच भरलेले आहे. जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील तलाव आणि विहिरी सध्या कोरड्या ठणठणीत आहेत. दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत गेल्यावर्षी १२५.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १३.६ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे, असे शासकीय आकडेवारीवरुन दिसत आहे.

दि. १ जून ते २६ जुलै २०१९ यावर्षी मिरज तालुक्यात १४१ टक्के, जत १२५ टक्के, वाळवा ९३ टक्के, तासगाव १११ टक्के, शिराळा १०० टक्के, आटपाडी १२३ टक्के, कवठेमहांकाळ १५९ टक्के, पलूस ८५ टक्के, कडेगाव ११५ टक्के आणि सर्वात कमी खानापूर तालुक्यात ७० टक्के पाऊस झाल्याची नोंद पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाकडील पर्जन्यमापकावर झाली आहे. प्रत्यक्षात दुष्काळी भागाकडे पाहिल्यानंतर मात्र पावसाच्या आकडेवारीबद्दल शेतकऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. पाऊस पडला तर त्याचे पाणी कुठे गेले, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहे. कारण, आजही दुष्काळी भागातील तलाव कोरडे असून विहिरी आणि विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. खरिपाची पेरणी जिल्ह्यात जवळपास ९० टक्केहून जास्त झाली आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्यामुळे खरिपाची कोवळी पिके कोमेजू लागली आहेत.

चांदोली धरण : परिसरात पाऊसवारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाने दीड हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला, तर धरण ६५ टक्के भरले आहे. मुसळधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. शुक्रवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाच हजार २५१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासात ५२ मिलिमीटर पावसासह एकूण एक हजार ५१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाण्याची पातळी ६१३.२५ मीटर झाली असून पाणीसाठा २२.३६ टीएमसी झाला आहे. त्याची टक्केवारी ६५ आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरूच आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची हजेरीसांगली, मिरज शहरास जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने दिवसभर हजेरी लावली होती. रिमझिम सरी येत असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. शिराळा, वाळवा तालुक्यासह दुष्काळी काही गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांना पावसाने हुलकावणीच दिल्यामुळे दिली आहे. खरीप हंगाम वाया जाणार की काय, अशा चिंतेत शेतकरी सध्या दिसत आहे.