शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

शासकीय दप्तरी सांगली जिल्ह्यात ११२ टक्के पाऊस : दुष्काळी भाग कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:25 IST

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे आहे.

ठळक मुद्देखानापूर तालुक्यात खरीप पेरण्या थांबल्या

सांगली : मान्सूनपूर्व आणि मान्सूनचा असा दोन्ही पाऊस जिल्ह्यात बरसलाच नसल्यामुळे जिल्ह्यात तलाव आणि विहिरी कोरड्या ठणठणीत आहेत. तरीही शासनाच्या पर्जन्यमान यंत्रावर मात्र जिल्ह्यात दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत सरासरी ११२ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. गंमत म्हणजे दुष्काळी भागामध्ये सध्या २५० च्यावर टँकर चालू असताना दुष्काळी तालुक्यात सरासरी १०० टक्केहून जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. एवढा पाऊस असतानाही खरीप पेरणीच्या पिकांनी मात्र माना टाकल्याचे दुष्काळी तालुक्यातील चित्र आहे.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे असल्याचे दिसत आहे. दरवर्षी साधारणपणे दि. २६ जुलैपर्यंत चांदोली धरण शंभर टक्के भरलेले असते. यावर्षी पावसाळा संपण्यास वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असताना चांदोली धरण केवळ ६० ते ६५ टक्केच भरलेले आहे. जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील तलाव आणि विहिरी सध्या कोरड्या ठणठणीत आहेत. दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत गेल्यावर्षी १२५.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १३.६ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे, असे शासकीय आकडेवारीवरुन दिसत आहे.

दि. १ जून ते २६ जुलै २०१९ यावर्षी मिरज तालुक्यात १४१ टक्के, जत १२५ टक्के, वाळवा ९३ टक्के, तासगाव १११ टक्के, शिराळा १०० टक्के, आटपाडी १२३ टक्के, कवठेमहांकाळ १५९ टक्के, पलूस ८५ टक्के, कडेगाव ११५ टक्के आणि सर्वात कमी खानापूर तालुक्यात ७० टक्के पाऊस झाल्याची नोंद पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाकडील पर्जन्यमापकावर झाली आहे. प्रत्यक्षात दुष्काळी भागाकडे पाहिल्यानंतर मात्र पावसाच्या आकडेवारीबद्दल शेतकऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. पाऊस पडला तर त्याचे पाणी कुठे गेले, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहे. कारण, आजही दुष्काळी भागातील तलाव कोरडे असून विहिरी आणि विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. खरिपाची पेरणी जिल्ह्यात जवळपास ९० टक्केहून जास्त झाली आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्यामुळे खरिपाची कोवळी पिके कोमेजू लागली आहेत.

चांदोली धरण : परिसरात पाऊसवारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाने दीड हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला, तर धरण ६५ टक्के भरले आहे. मुसळधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. शुक्रवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाच हजार २५१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासात ५२ मिलिमीटर पावसासह एकूण एक हजार ५१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाण्याची पातळी ६१३.२५ मीटर झाली असून पाणीसाठा २२.३६ टीएमसी झाला आहे. त्याची टक्केवारी ६५ आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरूच आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची हजेरीसांगली, मिरज शहरास जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने दिवसभर हजेरी लावली होती. रिमझिम सरी येत असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. शिराळा, वाळवा तालुक्यासह दुष्काळी काही गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांना पावसाने हुलकावणीच दिल्यामुळे दिली आहे. खरीप हंगाम वाया जाणार की काय, अशा चिंतेत शेतकरी सध्या दिसत आहे.