शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एसटी महामंडळाला ४५०० कोटींचा तोटा : हनुमंत ताटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:31 IST

याला राज्य सरकारची चुकीची धोरणेच जबाबदार आहेत, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देशासन धोरण कारणीभूत; राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी

सांगली : खासगी प्रवासी वाहतुकीचे वाढते अतिक्रमण आणि शासनाकडून प्रवासी कर, मोटार वाहन कर, टोल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करामुळे एसटी महामंडळ खूप आर्थिक अडचणीत सापडले आहे. वर्षाला ४५०० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. याला राज्य सरकारची चुकीची धोरणेच जबाबदार आहेत, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली.

 

ते म्हणाले की, एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत येण्यास अनेक घटक कारणीभूत असून, त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे खासगी प्रवासी वाहतूक आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाचे वर्षाला हजार ते बाराशे कोटींचे नुकसान होत आहे. डोंगराळ व दुर्गम भागातसुध्दा एसटीला फेऱ्या चालवाव्या लागतात. यामुळे ६०० कोटींचे नुकसान होत आहे. खासगी वाहतूकदार सर्रास टप्पे वाहतुकीचा वापर करीत आहेत. यामुळे महामंडळाचा संचित तोटा ४५०० कोटींवर गेला आहे. दिवसाला अंदाजे १.५० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. महामंडळाकडे भांडवली अंशदान म्हणून केंद्र सरकारचे १६ कोटी, तर राज्य सरकारचे ३५ कोटीची अल्प गुंतवणूक आहे. वर्षामध्ये प्रवासी कर, मोटार वाहन कर, टोल टॅक्स, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर असे मिळून १०३८ कोटी रुपये शासनास भरावे लागत आहेत. महामंडळाकडून १७.५ टक्के दराने प्रवासी कर वसूल करते, जो देशात सर्वात जास्त दर आहे. इतर राज्यात ७ ते १० टक्के इतकाच प्रवासी कर आकारला जातो.

महामंडळाच्या सर्व वाहनांना पथकरातून मुक्ती मिळावी, डिझेलमध्ये सवलत द्यावी, प्रवाशांना किफायतशीर दरात प्रवास उपलब्ध करून दिल्यास खासगी वाहतुकीने प्रवास करण्याची संख्या कमी होईल, सर्व कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करुन त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आदी मागण्या करण्यात येणार आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ताटे यांनी दिला.

दरम्यान, संघटनेचा सांगलीत मेळावाही झाली. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव नारायण सूर्यवंशी, अध्यक्ष अशोक खोत, विभागीय कार्याध्यक्ष शमू मुल्ला, दिलीप चौगुले, अशोक शिरोटे, मनोज पाटील, राजेश पाटील, सुधीर कोळी, रवी शिराळकर, शबाना मुलाणी आदी उपस्थित होते.

  • कामगारांच्या वेतनवाढीची कोंडी दूर करा

तत्कालीन अध्यक्षांनी १ जून २०१८ रोजी २०१६ ते २०२० या कालावधीच्या वेतन करारासाठी ४८४९ कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु प्रशासनाने वाटप करताना ज्या सूत्रानुुसार वेतनवाढ लागू केली आहे, त्यानुसार त्यामधील १५०० कोटीपेक्षा जास्त रक्कम शिल्लक राहते. संघटना वेतनवाढीच्या प्रस्तावावर तडजोड करण्यास तयार आहे, असे प्रशासनास कळवूनही तडजोड केली जात नाही. यावरही तोडगा काढावा, अशी मागणीही हनुमंत ताटे यांनी केली.

 

टॅग्स :Sangliसांगलीstate transportएसटी