शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By अशोक डोंबाळे | Updated: December 31, 2022 19:20 IST

पाच कारखान्यांचे गळीत हंगाम बंदच

सांगली : जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १३ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमात सुरू आहेत. पाच कारखान्यांच्या व्यवस्थापनाने अनेक प्रयत्न करूनही त्यांना या वर्षाचेही गळीत हंगाम चालू करता आले नाहीतच. १३ कारखान्याने आतापर्यंत ३८ लाख ९४ हजार ५३० टन उसाचे गाळप करून ४१ लाख ६७ हजार ५०४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

आटपाडी तालुक्यातील माणगंगा, कवठेमहांकाळचा महांकाली, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे तासगाव आणि नागेवाडी, पृथ्वीराज देशमुख यांचा केन ॲग्रो हे पाच कारखाने या वर्षीही गळीत हंगाम चालू करू शकले नाहीत. उर्वरित १३ साखर कारखान्यांचे मात्र जोमात गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ५० टक्केपर्यंत उसाचे गाळप करण्यात कारखाने यशस्वी झाले आहेत. पण, अनेक कारखाने सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून ऊस गाळपास आणत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेतातच राहिला आहे. काही शेतकऱ्यांच्या उसाला तर १३ ते १४ महिने होऊनही गाळपास गेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याकडेही साखर कारखानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांकडील उसाचे गाळप

कारखाना                         ऊस गाळप (टन) साखर क्विंटल उतारा

राजारामबापू (साखराळे) ३७६१४५             ३९५५०० १०.६३राजारामबापू (वाटेगाव) २३९९८०             २८३५०० ११.९०

राजारामबापू (कारंदवाडी) १७९१०५             २१५३५० १२.०९राजारामबापू (जत)            १६८९९५             १७८१७० १०.५५

हुतात्मा (वाळवा)             २१७६१०             २०७०७५ १०.८५मोहनराव शिंदे (म्हैसाळ) २२६५००             २४३४०० १०.८८

क्रांती (कुंडल)             ४०५१३०             ४२८९०० १०.७५सोनहिरा (वांगी)             ३९३५२०             ४४९६०० ११.५७

वसंतदादा (दत्त इंडिया) ५२९८३८             ५४९५३० १०.३८उदगिरी शुगर (बामणी) २७०५५०             २९२८५० १०.९५

विश्वास (चिखली)            २९८५५०             ३४३०५० ११.६१श्री श्री शुगर (राजेवाडी) ३५१५२७             ३०७८२९ ८.८८

दालमिया (करंगुली) २३८०८०             २७४७५० ११.५४

चौदा महिने होऊनही उसाला तोड नाही

शेतकऱ्यांनी उसाची लागवण करून १३ ते १४ महिने होऊनही साखर कारखान्यांकडून वेळेत तोडी मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी उसाला तुरे आले असून वजनही घटणार असल्यामुळे शेतकरी ऊस तोडी मिळविण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडे फेऱ्या मारत आहेत.

गाळपात दत्त इंडिया, उताऱ्यात राजारामबापूची आघाडी

सांगलीतील वसंतदादा-दत्त इंडिया कारखान्याने आतापर्यंत ५ लाख २९ हजार ८३८ टन उसाचे गाळप करून ५ लाख ४९ हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.३८ टक्केच आहे. राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने १ लाख ७९ हजार १०५ टन उसाचे गाळप करून २ लाख १५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १२.०९ टक्के घेऊन आघाडी घेतली आहे.

टॅग्स :Sangliसांगली