शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By अशोक डोंबाळे | Updated: December 31, 2022 19:20 IST

पाच कारखान्यांचे गळीत हंगाम बंदच

सांगली : जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १३ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमात सुरू आहेत. पाच कारखान्यांच्या व्यवस्थापनाने अनेक प्रयत्न करूनही त्यांना या वर्षाचेही गळीत हंगाम चालू करता आले नाहीतच. १३ कारखान्याने आतापर्यंत ३८ लाख ९४ हजार ५३० टन उसाचे गाळप करून ४१ लाख ६७ हजार ५०४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

आटपाडी तालुक्यातील माणगंगा, कवठेमहांकाळचा महांकाली, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे तासगाव आणि नागेवाडी, पृथ्वीराज देशमुख यांचा केन ॲग्रो हे पाच कारखाने या वर्षीही गळीत हंगाम चालू करू शकले नाहीत. उर्वरित १३ साखर कारखान्यांचे मात्र जोमात गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ५० टक्केपर्यंत उसाचे गाळप करण्यात कारखाने यशस्वी झाले आहेत. पण, अनेक कारखाने सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून ऊस गाळपास आणत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेतातच राहिला आहे. काही शेतकऱ्यांच्या उसाला तर १३ ते १४ महिने होऊनही गाळपास गेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याकडेही साखर कारखानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांकडील उसाचे गाळप

कारखाना                         ऊस गाळप (टन) साखर क्विंटल उतारा

राजारामबापू (साखराळे) ३७६१४५             ३९५५०० १०.६३राजारामबापू (वाटेगाव) २३९९८०             २८३५०० ११.९०

राजारामबापू (कारंदवाडी) १७९१०५             २१५३५० १२.०९राजारामबापू (जत)            १६८९९५             १७८१७० १०.५५

हुतात्मा (वाळवा)             २१७६१०             २०७०७५ १०.८५मोहनराव शिंदे (म्हैसाळ) २२६५००             २४३४०० १०.८८

क्रांती (कुंडल)             ४०५१३०             ४२८९०० १०.७५सोनहिरा (वांगी)             ३९३५२०             ४४९६०० ११.५७

वसंतदादा (दत्त इंडिया) ५२९८३८             ५४९५३० १०.३८उदगिरी शुगर (बामणी) २७०५५०             २९२८५० १०.९५

विश्वास (चिखली)            २९८५५०             ३४३०५० ११.६१श्री श्री शुगर (राजेवाडी) ३५१५२७             ३०७८२९ ८.८८

दालमिया (करंगुली) २३८०८०             २७४७५० ११.५४

चौदा महिने होऊनही उसाला तोड नाही

शेतकऱ्यांनी उसाची लागवण करून १३ ते १४ महिने होऊनही साखर कारखान्यांकडून वेळेत तोडी मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी उसाला तुरे आले असून वजनही घटणार असल्यामुळे शेतकरी ऊस तोडी मिळविण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडे फेऱ्या मारत आहेत.

गाळपात दत्त इंडिया, उताऱ्यात राजारामबापूची आघाडी

सांगलीतील वसंतदादा-दत्त इंडिया कारखान्याने आतापर्यंत ५ लाख २९ हजार ८३८ टन उसाचे गाळप करून ५ लाख ४९ हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.३८ टक्केच आहे. राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने १ लाख ७९ हजार १०५ टन उसाचे गाळप करून २ लाख १५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १२.०९ टक्के घेऊन आघाडी घेतली आहे.

टॅग्स :Sangliसांगली