शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By अशोक डोंबाळे | Updated: December 31, 2022 19:20 IST

पाच कारखान्यांचे गळीत हंगाम बंदच

सांगली : जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १३ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमात सुरू आहेत. पाच कारखान्यांच्या व्यवस्थापनाने अनेक प्रयत्न करूनही त्यांना या वर्षाचेही गळीत हंगाम चालू करता आले नाहीतच. १३ कारखान्याने आतापर्यंत ३८ लाख ९४ हजार ५३० टन उसाचे गाळप करून ४१ लाख ६७ हजार ५०४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

आटपाडी तालुक्यातील माणगंगा, कवठेमहांकाळचा महांकाली, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे तासगाव आणि नागेवाडी, पृथ्वीराज देशमुख यांचा केन ॲग्रो हे पाच कारखाने या वर्षीही गळीत हंगाम चालू करू शकले नाहीत. उर्वरित १३ साखर कारखान्यांचे मात्र जोमात गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ५० टक्केपर्यंत उसाचे गाळप करण्यात कारखाने यशस्वी झाले आहेत. पण, अनेक कारखाने सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून ऊस गाळपास आणत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेतातच राहिला आहे. काही शेतकऱ्यांच्या उसाला तर १३ ते १४ महिने होऊनही गाळपास गेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याकडेही साखर कारखानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांकडील उसाचे गाळप

कारखाना                         ऊस गाळप (टन) साखर क्विंटल उतारा

राजारामबापू (साखराळे) ३७६१४५             ३९५५०० १०.६३राजारामबापू (वाटेगाव) २३९९८०             २८३५०० ११.९०

राजारामबापू (कारंदवाडी) १७९१०५             २१५३५० १२.०९राजारामबापू (जत)            १६८९९५             १७८१७० १०.५५

हुतात्मा (वाळवा)             २१७६१०             २०७०७५ १०.८५मोहनराव शिंदे (म्हैसाळ) २२६५००             २४३४०० १०.८८

क्रांती (कुंडल)             ४०५१३०             ४२८९०० १०.७५सोनहिरा (वांगी)             ३९३५२०             ४४९६०० ११.५७

वसंतदादा (दत्त इंडिया) ५२९८३८             ५४९५३० १०.३८उदगिरी शुगर (बामणी) २७०५५०             २९२८५० १०.९५

विश्वास (चिखली)            २९८५५०             ३४३०५० ११.६१श्री श्री शुगर (राजेवाडी) ३५१५२७             ३०७८२९ ८.८८

दालमिया (करंगुली) २३८०८०             २७४७५० ११.५४

चौदा महिने होऊनही उसाला तोड नाही

शेतकऱ्यांनी उसाची लागवण करून १३ ते १४ महिने होऊनही साखर कारखान्यांकडून वेळेत तोडी मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी उसाला तुरे आले असून वजनही घटणार असल्यामुळे शेतकरी ऊस तोडी मिळविण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडे फेऱ्या मारत आहेत.

गाळपात दत्त इंडिया, उताऱ्यात राजारामबापूची आघाडी

सांगलीतील वसंतदादा-दत्त इंडिया कारखान्याने आतापर्यंत ५ लाख २९ हजार ८३८ टन उसाचे गाळप करून ५ लाख ४९ हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.३८ टक्केच आहे. राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने १ लाख ७९ हजार १०५ टन उसाचे गाळप करून २ लाख १५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १२.०९ टक्के घेऊन आघाडी घेतली आहे.

टॅग्स :Sangliसांगली