शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कडेगाव तालुक्यातील ३५ गावे सिटी सर्व्हेविना : नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:08 IST

देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे गरजेचे असताना, शासनाच्या दिरंगाईने गेल्या ७० वर्षांत या नोंदी शासनाने न केल्यामुळे गावठाणमधील हद्दी वादावादीचे विषय ठरत आहेत. कडेगाव तालुक्यातील ३५ गावांचा गेल्या ७० वर्षांत सिटी सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कडेगाव तालुका निर्माण होऊन १५ वर्षे झाली; पण अजून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील विविध विषय बाजूला पडले आहेत. सिटी सर्व्हे होणे हा ग्रामीण भागातील अत्यंत गरजेचा विषय असतानाही, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. तालुक्यात ३५ गावांतील जवळजवळ हजारो घरे व खुल्या जागांची शासनदरबारी नोंद नाही. या गावठाणमधील जागेचे नकाशेही शासनाने तयार केलेले नाहीत. त्यामुळे गावात कोणाची कोणती जागा आहे, यावरून गावा-गावात भांडणे व वादविवाद चालू असतात. ग्रामीण भागातील सर्वात जास्त तक्रारी या जागेवरून चालू असतात. या जागेचा सिटी सर्व्हे झाल्यास बरेच वाद कोर्टात न जाता मिटतील.

सत्तरच्या दशकात तालुक्यातील ५५ गावांपैकी फक्त १९ गावांचा सिटी सर्व्हे झाला. यामध्ये कडेगाव, कडेपूर, शाळगाव, विहापूर, अमरापूर, वडियेरायबाग, हिंगणगाव (बु), तोंडोली, येतगाव, नेवरी, शिवणी, देवराष्ट्रे, चिंचणी, मोहिते वडगाव, अंबक, रामापूर, वांगी, तडसर, हिंगणगाव खुर्द, तर उर्वरित ३५ गावे अजूनही सिटी सर्व्हेपासून वंचित आहेत. उर्वरित गावांचा सिटी सर्व्हे करण्यास शासनाने अद्याप हालचाल केलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.सर्व्हे नाही, कर्ज नाहीगावातील गावठाण जागेचा सिटी सर्व्हे झालेला नाही, नकाशा नाही, अशा कोणत्याही मालमत्तेवर बँक कर्ज देत नाही. सिटी सर्व्हे न झालेल्या जागेवर कर्ज मिळाले तर त्याचा बोजा संबंधित जागेवर चढविण्यास शासनाने ग्रामपंचायतींना मज्जाव केला आहे.उतारे फक्त करासाठी!गावठाणमधील मालमत्तेवर बँकांकडून कर्ज घेतल्यास त्याचा बोजा सिटी सर्व्हे उताºयावर चढविणे बंधनकारक आहे. याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करणे ग्राह्य नाही. ग्रामपंचायत उतारे हे कर गोळा करण्यासाठीचे आहेत, असा आदेश शासनाने काढल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार