शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

जत तालुक्यातील ३५ हजार मजुरांचे स्थलांतर

By admin | Updated: November 26, 2015 00:21 IST

गळीत हंगाम सुरू : दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस तोडणी कामगारांच्या संख्येत मोठी वाढ

गजानन पाटीलल्ल संखराज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने जत तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दुष्काळी परिस्थिती, वाया गेलेला पीक हंगाम, पावसाची दडी, बिब्ब्या रोगामुळे धोक्यात आलेल्या फळबागा यामुळे शेतमजूर ऊस तोडणीसाठी बाहेर पडत आहेत. यावर्षी मजुरांना कारखान्याकडून कमी अ‍ॅडव्हान्स रक्कम मिळूनही ऊसतोडणीसाठी जादा मजूर स्थलांतरित होत असल्याचे चित्र आहे. जत तालुक्यातून ३५ हजार मजुरांचे स्थलांतर झाले आहे.जिल्ह्यामध्ये विस्ताराने सर्वांत मोठा असणारा जत तालुका निसर्गाच्या अवकृपेने १९७२ पासून दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिराईत क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात जिराईत क्षेत्र ६१ हजार २९९ हेक्टर, तर बागायत क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर आहे. शेतीचे लागवडीखालील क्षेत्र कमी असल्यामुळे सहा महिने जगायचे कसे, असा प्रश्न येथील जनतेला कायम भेडसावत आहे. त्यातूनच १९५० च्या दशकात येथील लोकांना ऊसतोडीचा मार्ग गवसला. अतिशय खडतर व बिकट वाटचाल असणारा हा पर्याय आज त्यांच्या जगण्याचा आधार बनला आहे.शेतीमधून उत्पादित झालेल्या अन्नधान्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. डाळिंबावर बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव, कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या आहेत. म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याचा प्रश्न ३० वर्षांपासून मार्गी लागलेला नाही. कृषी मालावर प्रक्रिया उद्योगाची निर्मिती झालेली नाही. लघुउद्योग व कुटिर उद्योग नाहीत. तारांकित एमआयडीसी झालेली नाही. कापसाचे उत्पादन होऊनही सूतगिरण्या सुरू झालेल्या नाहीत. द्राक्षबागा असून वाईन उद्योग नाही. त्यामुळे हजारो तरूण बेरोजगार राहिले. शेतीही बेभरवशाची बनली आहे. ऊसतोडीशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही.मुकादमाच्या इशाऱ्यावर ऊसतोडणी मजूर स्थलांतरित होतात. सध्या ऊसतोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेकडून संपर्क सुरू आहे. लवादानी सरकारबरोबर बैठक करून निर्णय घेतला आहे. ऊसतोडणी मजुराच्या दरात २० टक्के वाढ, पाच वर्षांसाठी नवा करार, ऊसतोडणीचे मजूर जखमी, अपघाती मृत्यू झाल्यास त्यासंबंधी सामूहिक अथवा अन्य विमा योजना लागू करण्यासही लवादाने मंजुरी दिली. टनाला २२८ रुपये दर मिळणार आहे. पण ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांना निर्णय अमान्य केला आहे. राज्य सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप करीत कोयता बंद आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. पूर्णपणे मजूर एकजुटीने गावातून स्थलांतरित न होता संपावर गेले असते तर कदाचित या वर्षी तरी या मागण्या मान्य झाल्या असत्या. पण ही मोठी संधी संघटनेने घालवली आहे. मजुरांची पळवापळवी : हाणामारीचे प्र्रकारकर्नाटकमध्ये ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. कृष्णा नदी काठालगतच्या भागामध्ये ऊसक्षेत्र अधिक आहे. अधिक काळ हंगाम चालणार आहे. नवीन कारखान्यांची संख्या अधिक आहे. ऊसक्षेत्र जास्त असल्यामुळे हंगाम सहा महिन्यांपर्यंत चालणार आहे. कारखान्याचे शेती अधिकारी ग्रामीण भागात आले असून, मजुरांची पळवापळव सुरू आहे. मजूर पळवापळवीमुळे वादावादी, मारामारीचे प्रकार घडत आहेत. रस्त्यावर, गावात सर्वत्र ऊस तोडणी मजुरांचे ट्रॅक्टर, वाहनेच दिसत आहेत.