शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’च्या कामांसाठी कृषी विभाग घेतोय ३५ टक्के कमिशन

By admin | Updated: March 7, 2017 22:30 IST

जयकुमार गोरे : अधिकारीच म्हणे पैसे मंत्रालयापर्यंत द्यावे लागतात

खटाव : ‘जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांची फुगवलेली आकडेवारी अधिकारी शासनाकडे सादर करत आहेत. कामांचे कार्यालयात फक्त कागदावरच नियोजन केले जाते. कामे मात्र, त्या प्रमाणात होत नाहीत. कृषी विभाग जलयुक्त शिवारमधील कामांसाठी ३५ टक्के कमिशन घेत आहे. अधिकारीच हे पैसे मंत्रालयापर्यंत द्यावे लागतात. असे उघडपणे सांगतात,’ असा गौप्यस्फोट आमदार जयकुमार गोरे यांनी केला.अर्थसंकल्पीय अधिवेशनात जलयुक्त शिवार प्रस्ताव २९३ वर चर्चा करताना त्यांनी या योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आमदार गोरे म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना गती मिळाली होती. माझ्या मतदार संघातील माण-खटाव तालुक्यांमधील या कामांचा चांगला परिणाम संपूर्ण राज्याने साडेचार वर्षांपूर्वी पाहिला होता. सध्याच्या सरकारने अलीकडच्या काळात ‘जलयुक्त शिवार’ ही योजना सुरू केली आहे. आमच्याकडे अगोदरपासूनच जलसंधारणाची अशी कामे झाली आहेत.या सरकारने जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या कामांना मोठा निधी देण्याची घोषणा केली. तसा ठरावही केला. मात्र, प्रत्येक तालुक्याला प्रत्यक्षात किती निधी मिळाला. लोकसहभागातून किती निधी जमा झाला हे पाहणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांत माझ्या तालुक्यात फक्त तीन-साडेतीन कोटींचा निधी मिळाला. दोन वर्षांत इतक्या निधीतून ७४ गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली.’ आ. गोरे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार ही योजना शासन अधिकाऱ्यांमार्फत राबवत आहे. हेच अधिकारी या योजनेचा आराखडा कार्यालयात बसून कागदावर तयार करतात. प्रत्यक्षात साईट पाहिल्या जात नाहीत. स्थानिक स्तर विभागाकडून बंधाऱ्याच्या निवडलेल्या साईटस् चुकीच्या असतात. त्याचे बजेटही चुकीचे असते. (प्रतिनिधी)