शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

बहाद्दूरवाडीत ३३ जनावरे जळून खाक

By admin | Updated: April 3, 2015 23:57 IST

आगीचे तांडव : २५ लाखांचे नुकसान

गोटखिंडी : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील गावठाण हद्दीतील दळवी मळा परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत जनावरांचे १७ गोठे जळून खाक झाले. या जळीतकांडात ३३ जनावरे दगावली असून, सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे मुक्या जनावरांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीतील नुकसानीचे महसूल व पोलिसांकडून पंचनामे करण्यात आले. बहाद्दूरवाडी गावाच्या उत्तरेला गावठाण जागा आहे. या ठिकाणी राजारामबापू साखर कारखाना व वारणा साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांसह स्थानिक व बाहेरून आलेली रोजंदारी करणारी कुटुंबे छप्परवजा शेड घालून वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. भर उन्हाच्या तडाख्याने आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी व येथील बहाद्दूरवाडी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण उन्हाचा तडाखा असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. तोपर्यंत आष्टा, इस्लामपूर नगरपालिका व राजारामबापू साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या; पण तोपर्यंत आगीने हाहाकार माजविला होता. तिन्ही गाड्या व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण त्यांना यश येत नव्हते. त्यामुळे १५ म्हशी, ११ रेड्या, ४ गायी, ३ शेळ्या, कोकरे, कोंबड्या अशी ३३ जनावरे जळाली. याबरोबरच मजुरांचे संसारोपयोगी साहित्य, भांडी, धान्यही जळून खाक झाले. समीर म्हाबरी, जहाँगीर शेख, मौल्ला मुल्ला, कुमार खोत, बाजीराव खोत, भागिरथी वाघ, विलास खोत, बाबूराव निरुखे, गजानन खोत, पांडुरंग निरुखे, शंकर खोत, रामदास वडर, सुवर्णा खरळकर यांचे शेड, तर बबन कदम, गिते, संतोष गिते, बालाजी गिते, वैजनाथ जासूद, सोमनाथ केंद्रे, बासू नाईक, ठाकू राठोड यांच्या झोपड्या, जनावरे व संसारोपयोगी साहित्य या आगीत जळून खाक झाले.