शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या पाण्यासाठी ३२ गावांचा एल्गार - सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:04 IST

टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल,

ठळक मुद्देकुकुडवाड येथे पाणी परिषद : सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी निर्णायक भूमिका घेणार

कुकुडवाड (जि. सातारा) : कायम दुष्काळी असणाऱ्या माण-खटावला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या दुष्काळी परिस्थितीमुळे लोकशाहीच्या मार्गाने टेंभू योजनेच्या पाण्यासाठी शनिवार (दि.२०) कुकुडवाड येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये खटाव तालुक्यातील मायणी-कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरातील १६ अशा एकूण ३२ गावांतील शेतकरी व ग्रामस्थ एकत्र येणार आहेत, अशी माहिती टेंभू पाणी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठाम निर्धार कुकुडवाड ग्रामस्थांनी व परिसरातील लोकांनी एकत्र येऊन केला आहे.

पाणी मिळेपर्यंत हा लढा असाच चालू ठेवण्यात येणार असून, ‘आता नाही तर कधीच नाही,’ असा नारा देत पाण्याच्या संघर्षाला सुरुवात जनतेने केली आहे. दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी कलेढोण व कुकुडवाडसह परिसरातील व शेजारील वाड्यांना वरदान ठरणार आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला पशुपालक, मेंढपाळ, मातीकाम, रंगकाम आदींचा स्थलांतराचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेमुळे येथील परिसरातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटणार आहे. शेतकºयाचे कोलमडलेले आर्थिक नियोजन सुरळीत होणार आहे.

पाणी संघर्ष समितेचे आवाहनटेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कुकुडवाडसह परिसरातील वाड्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे म्हणून टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी येथील परिसराला देणे गरजेचे आहे, अशी मागणी टेंभू पाणी योजनेपासून वंचित राहिलेल्या कुकुडवाड, कलेढोण परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे तरी कुकुडवाड येथे होणाºया पाणी परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुकुडवाड टेंभू पाणी संघर्ष समितीने केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीTembhu Projectटेंभू धरण