शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

साखरेची दरवाढ व्यापाºयांच्याच घशात, क्विंटलला ३१५० दर : २५ टक्के साठ्याची केवळ घोषणाच--लोकमत विशेष;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:07 IST

सांगली : साखरेचे दर क्विंटलला २८०० रुपयांपर्यंत आल्यानंतर शासनाने २५ टक्के साखर खरेदीची घोषणा केली. साखर आयातीवर १०० टक्के आयात शुल्क आकारल्यामुळे क्विंटलला ३१५० रुपयांपर्यंत साखरेचे दर वाढले. परंतु,

ठळक मुद्दे साठेबाज फोफावले; शासनावर दबाव गरजेचा

अशोक डोंबाळे ।सांगली : साखरेचे दर क्विंटलला २८०० रुपयांपर्यंत आल्यानंतर शासनाने २५ टक्के साखर खरेदीची घोषणा केली. साखर आयातीवर १०० टक्के आयात शुल्क आकारल्यामुळे क्विंटलला ३१५० रुपयांपर्यंत साखरेचे दर वाढले. परंतु, या दरवाढीचा फायदा साठेबाजी करून ठेवलेल्या व्यापाºयांनाच होत आहे. नव्या साखर खरेदीला व्यापारी तयार नसल्यामुळे कारखान्यांपुढे बिल देण्याचा प्रश्न गंभीर आहे.साखर कारखानदारांच्या रेट्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे साखरेचा बफर स्टॉक करण्यासह, बिनव्याजी कर्ज, साखर आयात शुल्क वाढविण्याची मागणी केली होती.

त्यानुसार केंद्र शासनाने तातडीने बफर स्टॉक करण्यास आणि साखरेवरील आयात शुल्क शंभर टक्के करण्यास मंजुरी दिली. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साखर कारखान्यांकडील २५ टक्के साखर ३२०० रुपयांनी शासन तात्काळ खरेदी करणार आहे, अशी घोषणा महिन्यापूर्वी केली होती. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. राज्य सरकार साखर खरेदीचा आदेश कधी काढणार, याकडे कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. शासनाने ३२०० रुपयांनी साखर खरेदी तात्काळ केली नाही, तर भविष्यात पुन्हा दराचा प्रश्न गंभीर निर्माण आहे.

आयात शुल्क आणि साखर खरेदीची घोषणा केल्यानंतर लगेच साखरेचे दर क्ंिवटलला २८०० रुपयांवरुन ३१५० रुपयांपर्यंत वाढले. पण, या दरवाढीचा लाभ व्यापारीच उठवत असल्याचा साखर कारखानदारांचा आरोप आहे. याआधी २८०० रुपयांनी मराठवाडा-विदर्भातील साखर कारखान्यांकडून खरेदी केलेली साखर दर वाढल्यामुळे व्यापाºयांनी विक्रीसाठी बाहेर काढली आहे. दरवाढीचा फायदा कारखानदार आणि शेतकºयांना होण्याऐवजी तो पुन्हा व्यापाºयांच्याच घशात जात आहे. व्यापारी वाढीव दराने कारखानदारांकडील साखर खरेदी करण्यास तयार नाहीत. जिल्ह्यातील पाच ते सात साखर कारखान्यांनी मागील आठवड्यात साखर विक्रीची निविदा प्रसिध्द केली आहे. मात्र या निविदांना काहीही प्रतिसाद नसल्यामुळे व्यापाºयांची मक्तेदारी उघडकीस येत आहे. ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारनेच तात्काळ साखरेची प्रतिक्विंटल ३२०० रुपयांनी साखर खरेदी केली पाहिजे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारवर साखर कारखानदार, खासदार, आमदारांनी दबाव वाढविण्याची गरज आहे. कारखानदार आक्रमक नसल्यामुळे शासनाने घोषणा करुनही साखर खरेदी होतांना दिसत नाही.व्यापाºयांची साठेबाजी फार काळ टिकणार नाही : संजय कोलेव्यापारी आज त्यांच्याकडील साठा केलेली साखर विक्री करून त्यांचा फायदा मिळवत असतील; पण भविष्यात त्यांना साखरेची गरज लागणारच आहे. दर वाढत असल्याचा निश्चित कारखानदार आणि शेतकºयांना फायदा होणार आहे. काही साखर राज्य सरकारने त्वरित खरेदी करुन त्याचा साठा करुन ठेवल्यास आणखी दर वाढणार आहे. याचाही कारखान्यांना फायदा होणार आहे. यामुळे कारखानदारांनी शेतकºयांना एफआरपीप्रमाणे बिले त्यांच्या खात्यावर जमा केली पाहिजेत, अशी मागणी राज्य शासनाच्या ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य संजय कोले यांनी केली आहे.बिल थांबविणाºयांचे साखरेचे ट्रक पेटविणार :विकास देशमुखसाखर कारखानदारांनी व्यापाºयांच्या आढून शेतकºयांची लूट करू नये. व्यापाºयांनी आता साठेबाजी केली तर, भविष्यात ते साखर खरेदी करणारच आहेत. सध्या प्रतिक्विंटल साखरेला करासह ३३०० ते ३४२५ रुपयापर्यंत दर मिळत आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत कारखानदारांनी शेतकºयांना एफआरपी अधिक २०० रुपयेप्रमाणे पंधरा दिवसात बिले मिळाली पाहिजेत. अन्यथा त्यानंतर एकाही कारखान्याची साखर विक्री होऊ देणार नाही. प्रसंगी साखरेचे ट्रक पेटवून दिले जातील, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिला आहे.राज्यातील कारखाने व साखरेचा लेखाजोखाविभाग कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन उतारा(लाख टन) (लाख क्विंटल)कोल्हापूर ३७ १८२.५६ २२३.३३ १२.२३पुणे ६१ ३०१.९० ३२९.६० १०.९२अहमदनगर २६ १०९.०५ ११५.३३ १०.५८औरंगाबाद २३ ६७.७० ६५.१० ९.६२नांदेड ३२ ९४.७२ ९८.८९ १०.४४अमरावती २ ५.२८ ५.६५ १०.६९नागपूर ४ ४.६२ ४.५२ ९.७८एकूण १८५ ७६५.८३ ८४२.४२ ११.००यावर्षी २८ फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत राज्यातील १८५ साखर कारखान्यांनी ७६५.८३ लाख टन उसाचे गाळप करून विक्रमी ८४२.४२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या आकडेवारीचा विचार करता, सरकारने कारखान्यांकडील साखरेचा तातडीने साठा करण्याचीगरज आहे.अन्यथा साखर कारखान्यांसमोर भविष्यात अडचणी निर्माण होणार आहेत. या प्रश्नावर कारखानदारांनीही राज्य आणि केंद्र सरकारकडे रेटा लावण्याची गरज आहे.