शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

जिल्ह्यात ३०३ चालकांचे ‘लायसन्स’ रद्द

By admin | Updated: March 4, 2015 23:44 IST

आरटीओंचा दणका : सहा महिन्यांसाठी कारवाई; तळीरामांची संख्या अधिक

सचिन लाड - सांगली -दारूच्या नशेत वाहन चालविणे, वाहन चालवत मोबाईलवर संभाषण व बेदरकारपणे वाहन चालवून लोकांचा बळी घेणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मोहीम पोलीस व आरटीओ यांनी संयुक्तपणे सुरूकेली आहे. या तीनही गुन्ह्यांतील ३०३ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने (लायसन्स) निलंबित करण्याच्या जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पाठविलेल्या प्रस्तावाला आरटीओ दशरथ वाघुले यांनी मंजुरी दिली आहे. सर्व चालकांचे लायसन्स जप्त करून ते सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचा आदेश वाघुले यांनी जारी केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लायसन्स निलंबित करण्याची ही पहिली कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामांविरुद्ध पोलीसप्रमुख सावंत यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत जोरदार मोहीम उघडली. आठवड्यात किमान तीन ते चारवेळा नाकाबंदी करून तळीरामांची धरपकड केली जाते. कारवाईत सातत्य राहिल्याने रात्री नऊनंतर रस्त्यावर शुकशुकाट असतो. न्यायालयात दंड भरून तळीराम पुन्हा नशेत वाहन चालवितात. अशांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने त्यास मंजुरी देऊन पुढील कार्यवाही आरटीओ वाघुले यांना करण्याचा आदेश दिला होता. वाघुले यांनी तब्बल २१५ तळीरामांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. या सर्वांचे लायसन्स जप्त केले आहे. बेदरकारपणे वाहन चालवून लोकांचा बळी घेणाऱ्या संशयित वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी सावंत यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून त्यांनी आरटीओंना सादर केला होता. यातील १५ चालकांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातांची माहिती काढण्यात आली आहेत. यातील चालकांची यादी काढण्याचे काम अद्याप सुरू आहे. प्रत्येक महिन्याला नव्याने प्रस्ताव करून मंजुरीसाठी आरटीओंकडे पाठविले जात आहेत. महिन्याभरात चारशेहून अधिक चालकांचे लायसन्स निलंबित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र शे-दोनशे रुपयांच्या या दंडाची भीती वाहनचालकांना राहात नाही. ते पुन्हा मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालवितात. अपघातांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे त्यांचेही लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार यातील ४३ चालकांचे लायसन्सही सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. प्रलंबित प्रस्तावांवर लवकरच निर्णय वाघुले म्हणाले, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारची कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन केल्यास अपघात टळू शकतात. वाहतूक नियम व कायदा काय असतो, हे या कारवाईतून वाहनचालकांनी समजून घ्यावे. तळीराम, मोबाईलवरील संभाषण व अपघात प्रकरणातील अनेक चालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. लायसन्स निलंबित केले असल्याने या वाहनचालकांना आता वाहन चालविता येणार नाही. तसे त्यांनी केल्यास पुन्हा कारवाई होऊ शकते.