शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३०३ चालकांचे ‘लायसन्स’ रद्द

By admin | Updated: March 4, 2015 23:44 IST

आरटीओंचा दणका : सहा महिन्यांसाठी कारवाई; तळीरामांची संख्या अधिक

सचिन लाड - सांगली -दारूच्या नशेत वाहन चालविणे, वाहन चालवत मोबाईलवर संभाषण व बेदरकारपणे वाहन चालवून लोकांचा बळी घेणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मोहीम पोलीस व आरटीओ यांनी संयुक्तपणे सुरूकेली आहे. या तीनही गुन्ह्यांतील ३०३ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने (लायसन्स) निलंबित करण्याच्या जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पाठविलेल्या प्रस्तावाला आरटीओ दशरथ वाघुले यांनी मंजुरी दिली आहे. सर्व चालकांचे लायसन्स जप्त करून ते सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचा आदेश वाघुले यांनी जारी केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लायसन्स निलंबित करण्याची ही पहिली कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामांविरुद्ध पोलीसप्रमुख सावंत यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत जोरदार मोहीम उघडली. आठवड्यात किमान तीन ते चारवेळा नाकाबंदी करून तळीरामांची धरपकड केली जाते. कारवाईत सातत्य राहिल्याने रात्री नऊनंतर रस्त्यावर शुकशुकाट असतो. न्यायालयात दंड भरून तळीराम पुन्हा नशेत वाहन चालवितात. अशांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने त्यास मंजुरी देऊन पुढील कार्यवाही आरटीओ वाघुले यांना करण्याचा आदेश दिला होता. वाघुले यांनी तब्बल २१५ तळीरामांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. या सर्वांचे लायसन्स जप्त केले आहे. बेदरकारपणे वाहन चालवून लोकांचा बळी घेणाऱ्या संशयित वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी सावंत यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून त्यांनी आरटीओंना सादर केला होता. यातील १५ चालकांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातांची माहिती काढण्यात आली आहेत. यातील चालकांची यादी काढण्याचे काम अद्याप सुरू आहे. प्रत्येक महिन्याला नव्याने प्रस्ताव करून मंजुरीसाठी आरटीओंकडे पाठविले जात आहेत. महिन्याभरात चारशेहून अधिक चालकांचे लायसन्स निलंबित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र शे-दोनशे रुपयांच्या या दंडाची भीती वाहनचालकांना राहात नाही. ते पुन्हा मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालवितात. अपघातांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे त्यांचेही लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार यातील ४३ चालकांचे लायसन्सही सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. प्रलंबित प्रस्तावांवर लवकरच निर्णय वाघुले म्हणाले, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारची कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन केल्यास अपघात टळू शकतात. वाहतूक नियम व कायदा काय असतो, हे या कारवाईतून वाहनचालकांनी समजून घ्यावे. तळीराम, मोबाईलवरील संभाषण व अपघात प्रकरणातील अनेक चालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. लायसन्स निलंबित केले असल्याने या वाहनचालकांना आता वाहन चालविता येणार नाही. तसे त्यांनी केल्यास पुन्हा कारवाई होऊ शकते.