शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

जिल्ह्यात ३०३ चालकांचे ‘लायसन्स’ रद्द

By admin | Updated: March 4, 2015 23:44 IST

आरटीओंचा दणका : सहा महिन्यांसाठी कारवाई; तळीरामांची संख्या अधिक

सचिन लाड - सांगली -दारूच्या नशेत वाहन चालविणे, वाहन चालवत मोबाईलवर संभाषण व बेदरकारपणे वाहन चालवून लोकांचा बळी घेणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मोहीम पोलीस व आरटीओ यांनी संयुक्तपणे सुरूकेली आहे. या तीनही गुन्ह्यांतील ३०३ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने (लायसन्स) निलंबित करण्याच्या जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पाठविलेल्या प्रस्तावाला आरटीओ दशरथ वाघुले यांनी मंजुरी दिली आहे. सर्व चालकांचे लायसन्स जप्त करून ते सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचा आदेश वाघुले यांनी जारी केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लायसन्स निलंबित करण्याची ही पहिली कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामांविरुद्ध पोलीसप्रमुख सावंत यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत जोरदार मोहीम उघडली. आठवड्यात किमान तीन ते चारवेळा नाकाबंदी करून तळीरामांची धरपकड केली जाते. कारवाईत सातत्य राहिल्याने रात्री नऊनंतर रस्त्यावर शुकशुकाट असतो. न्यायालयात दंड भरून तळीराम पुन्हा नशेत वाहन चालवितात. अशांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने त्यास मंजुरी देऊन पुढील कार्यवाही आरटीओ वाघुले यांना करण्याचा आदेश दिला होता. वाघुले यांनी तब्बल २१५ तळीरामांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. या सर्वांचे लायसन्स जप्त केले आहे. बेदरकारपणे वाहन चालवून लोकांचा बळी घेणाऱ्या संशयित वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी सावंत यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून त्यांनी आरटीओंना सादर केला होता. यातील १५ चालकांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातांची माहिती काढण्यात आली आहेत. यातील चालकांची यादी काढण्याचे काम अद्याप सुरू आहे. प्रत्येक महिन्याला नव्याने प्रस्ताव करून मंजुरीसाठी आरटीओंकडे पाठविले जात आहेत. महिन्याभरात चारशेहून अधिक चालकांचे लायसन्स निलंबित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र शे-दोनशे रुपयांच्या या दंडाची भीती वाहनचालकांना राहात नाही. ते पुन्हा मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालवितात. अपघातांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे त्यांचेही लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार यातील ४३ चालकांचे लायसन्सही सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. प्रलंबित प्रस्तावांवर लवकरच निर्णय वाघुले म्हणाले, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारची कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन केल्यास अपघात टळू शकतात. वाहतूक नियम व कायदा काय असतो, हे या कारवाईतून वाहनचालकांनी समजून घ्यावे. तळीराम, मोबाईलवरील संभाषण व अपघात प्रकरणातील अनेक चालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. लायसन्स निलंबित केले असल्याने या वाहनचालकांना आता वाहन चालविता येणार नाही. तसे त्यांनी केल्यास पुन्हा कारवाई होऊ शकते.