शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सांगलीला थांबा नाकारुन रेल्वेचे ३० लाखाचे नुकसान, सहा गाड्यांना थांबा देण्याची मागणी

By अविनाश कोळी | Updated: April 27, 2024 15:47 IST

महाव्यवस्थापकांकडे तक्रार, आंदोलनाचा इशारा 

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात पुण्याखालोखाल सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगलीरेल्वे स्थानकावर थांबा नाकारण्याचा मध्य रेल्वेचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. नव्याने सहा गाड्यांना अन्यत्र थांबे देताना सांगलीला नाकारल्याने येथील रेल्वे प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.सध्या वेगवेगळ्या मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांना सांगलीत थांबा नाकारला होता. प्रवासी संघटनांच्या संतापानंतर काही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी हुबळी-मुझफ्फरपूर एक्सप्रेस (गाडी क्र. ०७१५), मुझफ्फरपूर ते हुबळी (गाडी क्र. ०७१६), हुबळी-पटना एक्सप्रेस (गाडी क्र. ०२६८५), पटना ते हुबळी (गाडी क्र. ०२६८६), हुबळी-ऋषिकेश एक्सप्रेस (गाडी क्र. ०६२२५), ऋषिकेश ते हुबळी (गाडी क्र. ०६२२६) या सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक थांबे याला मंजूर असताना केवळ सांगलीचा थांबा नाकारला गेला आहे.प्रवासी संघटनांनी दावा केला आहे की, या सहा गाड्यांना थांबा न दिल्यामुळे सांगलीतून मिळणाऱ्या अपेक्षित ३० लाख रुपयांच्या उत्पन्नावर मध्य रेल्वेने पाणी सोडले आहे. सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप, पश्चिम महाराष्ट्र रेल प्रवासी ग्रुप व सांगली चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे या सहा गाड्यांना त्वरित थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाव्यवस्थापकांकडे तक्रारमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव व प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक एस. एस. यादव यांच्याकडे येथील प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीचा थांबा नाकारल्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. सांगलीतून धावणाऱ्या गाड्यांच्या उत्पन्नाचे आकडे त्यांनी पत्रात दिले आहेत. प्रत्येक गाडीला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या या स्थानकाला थांबा का नाकारला जात आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

आंदोलन करण्याचा इशारानागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगलीला थांबा नाकारणे हा अन्याय आहे. प्रवाशांवर अन्याय करताना रेल्वेच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याचे कामही या माध्यमातून होत आहे. त्यामुळे तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे