शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

सांगली-पेठ रस्त्याचा ५४३ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:35 IST

खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांगली-पेठ रस्त्याचा ५४३ कोटींचा प्रस्तावकेंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाची घोषणा

सांगली : खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. संपूर्ण काँक्रिटीकरण व दुभाजकाचा आराखड्यात समावेश आहे. या रस्त्याच्या निधीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असून अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्यानंतरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षापूर्वी सांगलीपासून पेठपर्यंतच्या नागरिकांनी कृती समिती स्थापन केली होती.

२०१७ च्या दिवाळीच्या पहिल्यादिवशी या रस्त्यावरील खड्ड्यांत दिवे लावून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. या रस्त्यावर आजअखेर कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण रस्ता कधीच वर्षभरही टिकला नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेकदा पॅचवर्क केले, पण महिन्याभरात उखडले गेले. सांगली ते तुंगपर्यंतचा रस्ता तर मृत्यूचा सापळा बनला होता. सामाजिक संघटना, कृती समितीने वारंवार आंदोलने केल्यानंतर डिग्रज ते तुंगपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. पण सांगलीवाडी टोलनाका ते डिग्रजपर्यंतचा रस्ता आजही खराब आहे.

तुंगपासून आष्ट्यापर्यंतच्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी रस्ता चौपदरीकरण, तर काही ठिकाणी तीनपदरी रस्ता आहे. पेठ ते इस्लामपूरपर्यंतचा रस्ताही अरुंद आहे. या रस्त्यावर पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.अखेर रस्त्याच्या आंदोलनाला यश येत दोन वर्षापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर रस्त्याच्या चौपदरीकरणाची चर्चा सुरू झाली. राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. अखेर केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा केली.काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला. तब्बल ५४३ कोटींचा हा आराखडा केंद्र शासनाला सादर केला आहे. पेठपासून सांगलीवाडीपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. हा संपूर्ण रस्ता काँक्रिटचा असेल. हा रस्ता काळ्या मातीतून जात असल्याने काँक्रिटीकरणाशिवाय पर्याय नव्हता.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSangliसांगली