शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

..अन् सांगली जिल्ह्यात २८८ जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:46 IST

निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती

सांगली : ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन वर्ष होत आले, तरी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, या निर्णयामुळे वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील २८८ सदस्यांना दिलासा मिळाला आहे. जात वैधता प्रमाणपत्र आता ९ जुलै २०२४ पर्यंत सादर करता येईल.जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुका १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडल्या. काही उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र दिले आहे, तर दहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या २८८ उमेदवारांनी अजूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये राखीव जागेतून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.मात्र, लोकशाही प्रणालीमध्ये कुठलाही उमेदवार आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहू नये, या उद्देशाने प्रमाणपत्र त्यांच्याजवळ नसले तरी ते निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु निवडून आलेल्या अनेक उमेदवारांनी अद्याप प्रमाणपत्र सादर केलेले नाही.जिल्ह्यातील २८८ सदस्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अजूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. मात्र, हमीपत्र लिहून दिलेले आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईची सुरुवात करण्यात येणार होती. त्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांकडे संबंधित अहवाल मागवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अहवाल मागविल्यानंतर या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, त्यापूर्वीच सरकारने आदेश काढल्याने या सदस्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ९ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने त्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत