शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सांगली जिल्ह्यात २६ पासून होणार ‘स्वच्छतेचा महाजागर’ : अभिजित राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:25 IST

अस्वच्छताच अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होण्याची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद व वारकरी साहित्य परिषदेचा संयुक्त उपक्रम६९९ गावांमध्ये होणार प्रवचने

सांगली : अस्वच्छताच अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होण्याची नितांत गरज आहे. संतसाहित्यातील स्वच्छतेचा संदेश प्रवचनकार समाजापर्यंत चांगल्याप्रकारे पोहोचवतील. म्हणून २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधित ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ६० प्रवचनकारांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

जिल्हा परिषदेत जिल्हा पाणी, स्वच्छता मिशन कक्ष व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छतेचा महाजागर’ या अभियानाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, वारकरी साहित्य परिषदेच्या महिला आघाडी प्रमुख मालुश्री पाटील, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब नरुटे, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे आदी उपस्थित होते.

अभिजित राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासन (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) व वारकरी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ४४ हजार गावांमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून ६९९ गावांमध्ये २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधित ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम ६० प्रवचनकारांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. संतसाहित्यातून स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आहे आणि समाजावर संतांच्या विचारांचा पगडा असल्याने, शाश्वत स्वच्छतेसाठी प्रवचनकारांचा चांगला उपयोग होईल. मालुश्री पाटील म्हणाल्या, स्वच्छतेचा जागर करण्यासाठी वारकरी साहित्य परिषद पूर्ण सहकार्य करेल. वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब नरुटे यांनी यावेळी उपस्थित प्रवचनकारांना मार्गदर्शन केले.ग्रामस्थांना मार्गदर्शनदीपाली पाटील यांनी स्वच्छता अभियानातील सद्यस्थिती व स्वच्छतेच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. गावपातळीवर दिलीप मस्के, सतीश जाधव, सुनील सावंत व चंद्रकांत कचरे यांनी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिका