शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

युक्रेनमधून २५० भारतीय विद्यार्थी सुखरुप परतले; मंत्री कदमांनी केले शिवांजली, ऐश्वर्यांचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:17 IST

मुलांना एवढ्या मोठ्या संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर

प्रताप महाडीककडेगाव : रशिया युक्रेनच्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचे काम ऑपरेशन गंगा मोहीमे अंतर्गत  सुरूच आहे. काल, रविवारी सुरक्षितरित्या पोहचलेल्या २५० भारतीय विद्यार्थ्यांपैकी कडेगाव तालुक्यातील शिवांजली दत्तात्रय यादव व ऐश्वर्या सुनील पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील ९ विद्यार्थ्यांचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.पालकांनी विद्यार्थ्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. आपल्या मुलांना एवढ्या मोठ्या संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनीही कुटुंबियांच्या समवेत हा आनंदाचा क्षण अनुभवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.पुणे येथे  परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कडेगाव तालुक्यातील ऐश्वर्या व शिवांजली या दोघींसह  देवरुख येथील ३, बार्शी येथील २ तर कराड व लातूर येथील प्रत्येकी एक अशा ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुण्यात  सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला.महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधून गरजेनुसार त्यांना सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन केले जात आहे असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले...यामुळे आम्ही सुखरूप परतलो शिवांजली यादव  युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे वातावरण आहे.आम्ही आशा स्थितीत आम्ही  धाडसाने बाहेर पडलो आणि हंगेरीत पोहोचलो. तेथे केंद्र सरकार व  भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आम्ही सुखरूप परतलो आहोत. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सातत्याने आमच्याशी संपर्क साधून वेळीवेळी मार्गदर्शन केले व आम्हाला दिलासा  दिला अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया शिवांजली यादवने दिली.

टॅग्स :SangliसांगलीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया