शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Sangli: उपळावीत उष्माघाताने अडीचशे कोंबड्या मृत, लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:16 IST

कवठे एकंद : उपळावी (ता. तासगाव) येथील शेतकरी विठ्ठल शंकर शिंदे यांच्या पोल्ट्रीतील २५० कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन ...

कवठे एकंद : उपळावी (ता. तासगाव) येथील शेतकरी विठ्ठल शंकर शिंदे यांच्या पोल्ट्रीतील २५० कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन मृत्युमुखी पडल्या. सोमवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली. या उष्माघाताच्या संकटात शिंदे यांचे सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. मतकुणकी-कुमठे रोडवर उपळावी येथे सुमारे ७००० पक्ष्यांचे शेड त्यांनी उभारले आहे. त्यामध्ये २००० पोल्ट्रीच्या कोंबड्या आहेत.गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेमुळे दीडशेवर कोंबड्या दगावल्या आहेत. तर त्यातील अचानकपणे रविवारी सायंकाळी २५० कोंबड्या उन्हाच्या तडाख्यामुळे अस्वस्थ होऊन मृत्युमुखी पडल्या आहेत. सदर घटनेचा पंचनामा केला आहे. तीव्र उन्हामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. तरी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

सध्या सातत्याने कडक ऊन असल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी फॅन, पाण्याचे फवारे अशा उपाययोजना केल्या आहेत. परंतु चार-पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे उपाययोजनेत अडचणी येतात. हिट स्ट्रोक बसल्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्ज काढून जोडधंदा सुरू केला आहे. मात्र, या अचानक आलेल्या आपत्तीमुळे आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. -विठ्ठल शिंदे, पोल्ट्रीधारक शेतकरी, उपळावी, ता. तासगाव

टॅग्स :SangliसांगलीTemperatureतापमान