शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
2
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
3
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
4
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
5
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
6
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
8
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
9
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
10
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
11
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
12
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
13
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
14
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
15
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
16
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
17
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
18
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
19
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: February 1, 2015 00:51 IST

पोलिसांकडून फिर्याद : दोन महिलांच्या मृतदेहाची हेळसांड केल्याचे प्रकरण

सांगली : पलूस येथील रेश्मा शेख व जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील रुपाली पवार या मृत महिलांच्या मृतदेहांची हेळसांड केल्याप्रकरणी सांगली शहर व विश्रामबाग पोलिसांनी आज, शनिवार २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दलित महासंघ व रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलीस स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. रेश्मा शेख यांचा बुधवारी सकाळी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृतदेह विच्छेदन तपासणी करुन न घेता नातेवाईकांनी ताब्यात घेतला होता. मृतदेह दफन करण्यास नेल्यानंतर तिच्या माहेरकडील व दलित महासंघाचे कार्यकर्ते गेले होते. त्यांनी शवविच्छेदन तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. दलित महासंघाने, पलूस पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुन पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यावर तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करुन सांगलीत मृतदेहासह मोर्चा काढला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न केला होता. दलित महासंघाने तब्बल दोन दिवस मृतदेहाची हेळसांड केली. मोर्चा काढून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ठेवून पोलिसांनी सतीश मोहिते, अजित भोरे, बंडू कुरणे, बालाजी कांबळे, सागर जगदणे व अन्य अनोळखी अशा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुपाली पवार यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतावस्थेत त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पतीच्या संमतीने रुग्णालयात रुपाली यांचे नेत्रदान करुन घेतले होते. माहेरकडील लोकांना ही बाब खटकली. त्यांनी आमची का परवानगी घेतली नाही, अशी विचारणा करुन गोंधळ घातला होता. रुग्णालय चौकात स्वत:ची वाहने आडवी उभी करुन रास्ता रोको केला होता. या सर्व घडामोडीत मृतदेह तब्बल दहा ते बारा तास शवागृहात पडून होता. त्यांच्या या कृत्याने मृतदेहाची हेळसांड झाली. यामुळे सुरेश दुधगावकर, रत्नाकर नांगरे यांच्यासह पाच ते सहा अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.कायदा व सुव्यवस्थेला आव्हानपलूसच्या रेश्मा शेख यांचा मृत्यू होऊन मृतदेह दफन करण्यास नेला होता. असे असताना संशयितांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो दोन दिवस फिरवत ठेवला. सांगलीत मृतदेहासह मोर्चा काढला. रुपाली पवार यांच्या पतीचे संमतीपत्र असूनही माहेरच्या लोकांचे संमतीपत्र का घेतले नाही, असा जाब विचारुन यंत्रणेला चार ते पाच तास वेठीस धरले. या दोन्ही प्रकरणात संशयितांनी कायदा व सुव्यस्थेला एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्याने शांततेता भंग झाला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीसच फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशी कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.