शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Sangli: रेणावीत रविवारी २१ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

By हणमंत पाटील | Updated: December 8, 2023 11:43 IST

अरविंद पुजारी, मनीषा पाटील, मंदाकिनी सपकाळ यांना पुरस्कार जाहीर

खानापूर : रेणावी येथील श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, साहित्य, कला विकास मंचच्या वतीने २१ वे ग्रामीण साहित्य संमेलन १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात ‘श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ लेखक अरविंद पुजारी, मनीषा पाटील आणि मंदाकिनी सपकाळ यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे सचिव धर्मेंद्र पवार व निवड समितीचे अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे यांनी दिली.यंदाच्या पुरस्काराचे मानकरी असलेले अरविंद पुजारी यांची साहित्यकृती, साहित्यविचार आणि साहित्य समीक्षा याचे महाथोर वाचक अशी ओळख आहे. दुसऱ्या मानकरी देशिंग- हरोली येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या अध्यापिका कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर आहेत. ‘पायवाटेवरील दिवे’, ‘माती विश्व’, ‘नाती वांझ होताना’ हे कवितासंग्रह तसेच विचार मंथन हा भाषणसंग्रह प्रकाशित झालेला आहे. अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठानच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

देवराष्ट्रे येथील मंदाकिनी दत्तात्रय सपकाळ या महाराष्ट्ररत्न वि. स. पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन, तासगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ''लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : जीवन व कार्य'' हे चरित्र पुस्तक त्यांनी लिहिले आहे. मराठी व हिंदी विषयात त्यांनी कविता लिहिल्या आहेत. निबंध स्पर्धेत "अण्णा भाऊ साठे" या विषयात प्रथम क्रमांक मिळविला. निर्मिती विचारमंच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सुजन फाउंडेशन आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला आहे.रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता रेणावी येथे होणाऱ्या २१ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे धर्मेंद्र पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली