शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 15:57 IST

सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार

सांगली : पंढरपूरला जाणाऱ्या दिड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे मानधन देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील दिंड्यांची माहिती दिंडी संयोजकांकडून मागविली आहे.सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. त्यानुसार दिंड्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. शासनाने राज्यभरातील दिंड्यांसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अनुदानासाठी गेल्या सहा वर्षांपासून वारकरी साहित्य परिषदेकडून पाठपुरावा सुरू होता. प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती, त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता माहिती मागविण्यात आली आहे.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अवर सचिव प्रशांत वाघ यांनी साहित्य परिषदेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आषाढी वारीमध्ये किती दिंड्यांचा समावेश असतो याची माहिती द्यावी. प्रत्येक दिंडीचे नोंदणीपत्र, दिंड्यांच्या प्रभारींचे आधार कार्ड, दिंड्यांच्या नावाचे बँक खाते, आदी तपशील तातडीने द्यावा.वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले की, अधिकाधिक दिंड्यांना मानधनाचा लाभ व्हावा असा प्रयत्न आहे. आषाढी वारीतील प्रत्येक दिंडीला मानधन देण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागविले आहेत. दरम्यान, शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी या निर्णयाबद्दल शासनाचे आणि वारकरी साहित्य परिषदेचे अभिनंदन केले. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मानधनाची योजना अमलात आल्याचे पक्षाच्या बैठकीत सांगितले.

मानधनासाठी व्यसनमुक्तीचा निकषदरम्यान, दिंड्यांना मानधन देण्यात येणार असले, तरी त्यासाठी व्यसनमुक्तीचा निकष लावला जाणार आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनाचा उपक्रम सामाजिक न्याय विभाग राबवते. त्यामुळे दिंड्यांकडून वारीच्या सोहळ्यात व्यसनमुक्तीसाठी कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत याचीही माहिती द्यावी, अशी सूचना शासनाने केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Governmentसरकार