शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सांगली महापालिकेच्या पाणीपुरवठाकडून २० कोटीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 11:34 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीत २० कोटीचा टप्पा गाठला. गतवर्षीच्या तुलनेत तीन कोटी १३ लाख रुपयांची जादा वसुली झाली.

सांगली : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीत २० कोटीचा टप्पा गाठला. गतवर्षीच्या तुलनेत तीन कोटी १३ लाख रुपयांची जादा वसुली झाली. तसेच दोन कोटी रुपयांच्या थकीत कर वसुलीसाठी ८१६ नळ कनेक्शन्स तोडण्यात आल्याची माहिती विभागप्रमुख काका हलवाई यांनी दिली. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे चालू व मागील अशी ३७ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी २० कोटी ३ लाख ८१ हजार रुपये वसूल करण्यात यश आले आहे. यात सांगली व कुपवाडमधून १४ कोटी ५४ लाख, तर मिरजेतून ५ कोटी ४९ लाख रुपये वसूल झाले. गतवर्षीच्या तुलनेत ३ कोटी १३ लाख रुपयांची जादा वसुली झाली आहे. 

आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त मोसमी बर्डे, स्मृती पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाला यंदा २५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. थकीत ३७ कोटीपैकी बंद नळ कनेक्शन्स, झोपडपट्टीमधील कनेक्शन्स, तसेच पडीक मालमत्तांकडे पाणीपुरवठ्याची ६ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली होण्यास विलंब होणार आहे. त्यातच ऐन मार्चमध्ये कृष्णा नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्याचाही वसुलीवर परिणाम झाला.

त्यातच शेवटच्या टप्प्यात निवडणूक कामासाठी कर्मचारी गेल्याने वसुलीचे प्रमाण कमी झाले होते. वसुली विभागाचे प्रमुख काका हलवाई, वॉरंट आॅफिसर इब्राहिम पखाली, राजेंद्र पाटील, तुकाराम पाटील, नरेंद्र माळी, राम शिकलगार यांच्या प्रयत्नामुळे पहिल्यांदाच पाणीपुरवठा विभागाने २० कोटीचा टप्पा पार केला.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई