शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

सांगली जिल्ह्यातील १०४२ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी जमा, कृषी विभागाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:26 IST

फळ पीक विम्यास थंडा प्रतिसाद

सांगली : पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेत २०२३-२४ मृग बहारामध्ये सहा हजार ७४५ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. त्यापैकी एक हजार ४२ शेतकरी या विमा योजनेत पात्र झाले आहेत. या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईपोटी एक कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० रुपये वर्ग केले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेत गतवर्षी द्राक्ष, डाळिंब आणि लिंबू या पिकांचा समाविष्ट होता. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी यासाठी फळ पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेत अर्ज करावा लागतो. नुकसान झाले तर त्याचे पंचनामे होऊन भरपाई मिळते.गतवर्षी म्हणजे २०२३-२४ या वर्षात सहा हजार ७४५ शेतकऱ्यांनी फळ पीक विमा घेतला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी सात कोटी ७३ लाख ९५ हजार ७०८ रुपये विमा हप्त्यापोटी रक्कम भरली होती. त्यापैकी एक हजार ४२ शेतकरी या विमा योजनेसाठी पात्र झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.

बाधित शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असूनही ते शेतकरी पात्र होत नाहीत. त्यामुळे शेतकरी फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांपासून फळ पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या घटत आहे. गतवर्षी सहा हजार ७४५ शेतकऱ्यांपैकी एक हजार ४२ शेतकरी विम्यासाठी पात्र आहेत. अर्थात पाच हजार ७०३ शेतकरी अपात्र आहेत की काय, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

चालू वर्षी केवळ २७४६ शेतकऱ्यांनी उतरविला विमाजिल्ह्यात २०२४-२५ मृग बहारासाठी फळ पीक विमा भरण्याचे काम सुरू आहे. या फळ पीक विमा योजनेत द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, लिंबू आणि चिक्कू या फळ पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने जनजागृतीही सुरु केली आहे. जिल्ह्यात ९८९ कर्जदार, तर एक हजार ७५७ बिगर कर्जदार असे एकूण दोन हजार ७४६ शेतकऱ्यांनी फळ पीक विमा घेतला आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक