शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सांगली जिल्ह्यातील १०४२ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी जमा, कृषी विभागाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:26 IST

फळ पीक विम्यास थंडा प्रतिसाद

सांगली : पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेत २०२३-२४ मृग बहारामध्ये सहा हजार ७४५ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. त्यापैकी एक हजार ४२ शेतकरी या विमा योजनेत पात्र झाले आहेत. या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईपोटी एक कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० रुपये वर्ग केले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेत गतवर्षी द्राक्ष, डाळिंब आणि लिंबू या पिकांचा समाविष्ट होता. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी यासाठी फळ पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेत अर्ज करावा लागतो. नुकसान झाले तर त्याचे पंचनामे होऊन भरपाई मिळते.गतवर्षी म्हणजे २०२३-२४ या वर्षात सहा हजार ७४५ शेतकऱ्यांनी फळ पीक विमा घेतला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी सात कोटी ७३ लाख ९५ हजार ७०८ रुपये विमा हप्त्यापोटी रक्कम भरली होती. त्यापैकी एक हजार ४२ शेतकरी या विमा योजनेसाठी पात्र झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.

बाधित शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असूनही ते शेतकरी पात्र होत नाहीत. त्यामुळे शेतकरी फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांपासून फळ पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या घटत आहे. गतवर्षी सहा हजार ७४५ शेतकऱ्यांपैकी एक हजार ४२ शेतकरी विम्यासाठी पात्र आहेत. अर्थात पाच हजार ७०३ शेतकरी अपात्र आहेत की काय, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

चालू वर्षी केवळ २७४६ शेतकऱ्यांनी उतरविला विमाजिल्ह्यात २०२४-२५ मृग बहारासाठी फळ पीक विमा भरण्याचे काम सुरू आहे. या फळ पीक विमा योजनेत द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, लिंबू आणि चिक्कू या फळ पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने जनजागृतीही सुरु केली आहे. जिल्ह्यात ९८९ कर्जदार, तर एक हजार ७५७ बिगर कर्जदार असे एकूण दोन हजार ७४६ शेतकऱ्यांनी फळ पीक विमा घेतला आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक