शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

हिवताप विभागाने महिन्यात पकडले ५९१ डास! ; ‘क्युलेक्स’ डासांची संख्या सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:33 IST

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वर्षभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचे ५२७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या यावर्षी झाल्याने प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवाही सुरू आहे.

ठळक मुद्देअ‍ॅनाफिलीस : मलेरिया; क्युलेक्स : हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर; एडीस : डेंग्यू, चिकुनगुण्यासाथ नियंत्रणासाठी उपाययोजना

शरद जाधव ।सांगली : जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले असताना चिकुनगुण्या झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्यांची घनता तपासण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात हिवताप विभागाने तांत्रिक तपासणीसाठी विविध जातींचे ५९१ डास पकडले असून, त्याआधारे ज्या त्या भागात असलेले आजार व त्यावरील उपाययोजनेसंदर्भात प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

डेंग्यूसह चिकुनगुण्या, मलेरियासह इतर आजारांचे मूळ कारण डास असल्याने प्रशासनाने डास पकडण्याची मोहीम राबविल्याचा भास होत असला तरी, त्यात तथ्य नसून, तांत्रिक तपासणीसाठी त्या त्या भागात कोणत्या डासांची संख्या अधिक आहे, या डासांमध्ये कोणता रोग पसरविण्याची क्षमता आहे, याचा अहवाल तयार करण्यासाठी डासांची तपासणी केली जाते.

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वर्षभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचे ५२७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या यावर्षी झाल्याने प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यात एडीस एजिप्तीया, अ‍ॅनाफिलीस व क्युलेक्स डासांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. नोव्हेंबर महिन्यात केलेल्या तपासणीत जिल्ह्यात क्युलेक्स डासांचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. त्यानंतर अ‍ॅनाफिलीस डासांची संख्या असून, डेंग्यूला कारणीभूत असणाºया एडीस डासांची संख्या तिस-या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत १६ गावांमध्ये प्रशासनाने हा सर्व्हे केला आहे.

असे पकडले जातात डास --- डास अळींचे प्रमाण आढळलेल्या भागात अडीच तासांच्या कालावधित प्लास्टिकच्या नळीच्या माध्यमातून डास पकडले जातात. पकडलेले डास परीक्षा नळीत घेऊन त्याचे परीक्षण करून त्याचा अहवाल संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकेला दिला जातो, जेणेकरून संभाव्य रोगावर नियंत्रण मिळविणे त्यांना शक्य होईल. जिल्ह्यात कीटक संहारकांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. 

जिल्ह्यातील या भागात मोहीमजिल्ह्यात संजयनगर, पेड, वड्डी, मिरज-खणभाग, सावळी, उमदी, रामपूर, अभयनगर-सांगली, कवठेपिरान, तुंग, वाझर, पलूस, मालगाव, आटपाडी, मौजे डिग्रज आणि बुधगाव या १६ गावांतील डासांची घनता तपासण्यात आली.

 

प्रशासनाकडून डास पकडून त्याची घनता काढली जाते. या तपासणीत आढळून येणाऱ्या डासांमुळे कोणता आजार होऊ शकतो याबाबत माहिती दिली जाते. ज्या त्या भागातील डासांची माहिती मिळाल्याने उपाययोजना करणे सोईचे होते.- डॉ. विवेक पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी

 

 

 

टॅग्स :Sangliसांगली