शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमध्ये १७६ कोटी पडून, सांगली जिल्ह्यात ३९ लाखाचे मालक सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:33 IST

खातेदारांच्या चेहऱ्यावर आनंद

सांगली : विविध बँकांमध्ये खातेदारांच्या दहा वर्षांपासून दावा न केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विशेष मोहीम राबविली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३३४ खातेदारांना एकूण ३८ लाख ९९ हजार रुपये परत करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे पैसे मिळालेल्या खातेदारांनी आनंद व्यक्त केला आहे.जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम सुमारे १७६ कोटी रुपये असून, सात लाख ७५ हजार ३१५ खातेदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा अग्रणी कार्यालय, बँक ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा बँकेत मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे, बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागाचे उपआंचलिक प्रबंधक विशालकुमार सिंह, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ, एलआयसी सातारा विभागाच्या मॅनेजर संगीता हिंगमिरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील दावा न केलेल्या रकमेची खातेदारांना परतफेड होणे हे उपक्रम संबंधितांसाठी चांगलेच साहाय्य ठरेल. प्राप्त रकमेचा योग्य उपयोग करावा आणि गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच तालुकास्तरावर व गावागावात या उपक्रमाची माहिती पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, बँकांनी व्हॉट्सऍप, एसएमएस व अन्य माध्यमांतून खातेदारांना संबंधित माहिती द्यावी. आपला हक्काचा पैसा मिळवण्यासाठी खातेदारांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विविध खातेदारांना दावा न केलेल्या रकमेचे प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश प्रदान करण्यात आला.

पैसे मागणीसाठी तीन महिन्यांची मुदत :रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जर खातेदाराने बचत, चालू किंवा मुदत ठेव अशा खात्यावर दहा वर्षांत कुठलाही व्यवहार केला नसेल, तर ती रक्कम संबंधित बँक आरबीआयकडे जमा करेल. अशी रक्कम मागण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून रक्कम मागण्यास तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹3.9 Million Found for Sangli Owner; ₹176 Crore Unclaimed in Banks

Web Summary : Sangli district returned ₹3.9 million to 334 account holders from unclaimed bank deposits. ₹176 crore remains unclaimed. A special campaign encourages account holders to claim their money within three months.