शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सांगली महापालिकांच्या एलबीटी अनुदानात १६ टक्के कपात, आर्थिक अडचणी वाढणार 

By अविनाश कोळी | Updated: August 23, 2024 17:05 IST

शहरांच्या विकासकामांवर परिणाम शक्य

अविनाश कोळीसांगली : ज्या अनुदानावर महापालिकांच्या अर्थकारणाचा डोलारा उभा आहे, त्या एलबीटी अनुदानाला राज्य शासनाने कात्री लावली आहे. राज्यभरातील महापालिकांच्या ऑगस्ट महिन्यातील अनुदानाला १६ टक्के कात्री लावली आहे. त्यामुळे महापालिकांच्या विकासकामांवर मोठा परिणाम होण्याची दाट चिन्हे आहेत.राज्य शासनाने २०१७ मध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केल्यानंतर या कराच्या माध्यमातून महापालिकांच्या उत्पन्नात येणारी तूट भरून महापालिकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सुरूवातीला राज्यभरातील त्यावेळच्या २५ महापालिकांना एकूण ४७९ कोटी ७१ लाख वितरित करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये अनुदानात जवळपास दुप्पट वाढ केल्याने दरमहा राज्याच्या तिजोरीतून तितकी वाढीव तरतूद करण्यात आली.सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला आजवर दरमहा १८ कोटी २२ लाख रुपयांचे अनुदान मिळत हाेते. ऑगस्टमध्ये प्राप्त झालेल्या अनुदानात १६ टक्के कपात करण्यात आली. यंदा हे अनुदान १५ कोटी रुपये आले आहे. राज्यातील अन्य महापालिकांच्या एलबीटी अनुदानालाही अशीच कात्री लावण्यात आली आहे.एलबीटी अनुदानावर महापालिकांचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे. पूर्वी जकात व त्यानंतर एलबीटी हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. शासनाने हा कर बंद केल्यानंतर महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला. महापालिकांची ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी एकूण अंदाजित नुकसानाच्या ७० टक्क्यांच्या आसपास अनुदान मंजूर करण्यात आले. त्यामुळे महापालिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आस्थापना व विकासकामांवरील खर्चाचा ताळमेळ घालताना महापालिकांना कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत आता अनुदान कपातीमुळे महापालिकांची आर्थिक घडी विस्कळीत होणार आहे.

‘ड’ वर्ग महापालिकांच्या अडचणी वाढल्या

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांच्या अनुदानात २ ते ६ कोटींची कपात झाली आहे. इतक्या रकमेची तूट भरून कशी काढायची? असा प्रश्न आता महापालिकांना सतावणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिका क्षेत्रातील विकासकामांना निधीची कमतरता जाणवणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली