शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सांगली महापालिकांच्या एलबीटी अनुदानात १६ टक्के कपात, आर्थिक अडचणी वाढणार 

By अविनाश कोळी | Updated: August 23, 2024 17:05 IST

शहरांच्या विकासकामांवर परिणाम शक्य

अविनाश कोळीसांगली : ज्या अनुदानावर महापालिकांच्या अर्थकारणाचा डोलारा उभा आहे, त्या एलबीटी अनुदानाला राज्य शासनाने कात्री लावली आहे. राज्यभरातील महापालिकांच्या ऑगस्ट महिन्यातील अनुदानाला १६ टक्के कात्री लावली आहे. त्यामुळे महापालिकांच्या विकासकामांवर मोठा परिणाम होण्याची दाट चिन्हे आहेत.राज्य शासनाने २०१७ मध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केल्यानंतर या कराच्या माध्यमातून महापालिकांच्या उत्पन्नात येणारी तूट भरून महापालिकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सुरूवातीला राज्यभरातील त्यावेळच्या २५ महापालिकांना एकूण ४७९ कोटी ७१ लाख वितरित करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये अनुदानात जवळपास दुप्पट वाढ केल्याने दरमहा राज्याच्या तिजोरीतून तितकी वाढीव तरतूद करण्यात आली.सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला आजवर दरमहा १८ कोटी २२ लाख रुपयांचे अनुदान मिळत हाेते. ऑगस्टमध्ये प्राप्त झालेल्या अनुदानात १६ टक्के कपात करण्यात आली. यंदा हे अनुदान १५ कोटी रुपये आले आहे. राज्यातील अन्य महापालिकांच्या एलबीटी अनुदानालाही अशीच कात्री लावण्यात आली आहे.एलबीटी अनुदानावर महापालिकांचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे. पूर्वी जकात व त्यानंतर एलबीटी हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. शासनाने हा कर बंद केल्यानंतर महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला. महापालिकांची ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी एकूण अंदाजित नुकसानाच्या ७० टक्क्यांच्या आसपास अनुदान मंजूर करण्यात आले. त्यामुळे महापालिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आस्थापना व विकासकामांवरील खर्चाचा ताळमेळ घालताना महापालिकांना कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत आता अनुदान कपातीमुळे महापालिकांची आर्थिक घडी विस्कळीत होणार आहे.

‘ड’ वर्ग महापालिकांच्या अडचणी वाढल्या

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांच्या अनुदानात २ ते ६ कोटींची कपात झाली आहे. इतक्या रकमेची तूट भरून कशी काढायची? असा प्रश्न आता महापालिकांना सतावणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिका क्षेत्रातील विकासकामांना निधीची कमतरता जाणवणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली